AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लष्करातील जवान सुटीवर आला, त्याची ही सुटी शेवटचीच ठरली, जमिनीचा वाद जीवावर उठला

गावात जमिनीवरून वाद झाला. यात १० ते १२ गावगुंडांनी जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. जवानाचा मृत्यू झाला.

लष्करातील जवान सुटीवर आला, त्याची ही सुटी शेवटचीच ठरली, जमिनीचा वाद जीवावर उठला
Image Credit source: shutterstock
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 27, 2023 | 5:01 AM
Share

कुणाल जायकर, प्रतिनिधी, अहमदनगर : वाद गावागावात होत असतात. त्यातून काही दुर्घटनाही होतात. जमिनीच्या वादातून दरवर्षी काही ना काही दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना नगरमध्ये घडली. गावातील एक जवान लष्करात भरती होता. तो सुटीवर गावी आला. गावात जमिनीवरून वाद झाला. यात १० ते १२ गावगुंडांनी जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. जवानाचा मृत्यू झाला. त्यामुळे जवानाची लष्करातील सुटी ही शेवटची सुटी ठरली. आता या घटनेवरून गावात तणावाचे वातावरण आहे. गावगुंडांवर कारवाई व्हावी, यासाठी गावकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

शेतीच्या वादातून दुर्घटना

सुट्टीवर आलेल्या जवानावर शेतीच्या वादातून हल्ला करण्यात आलाय. बायजाबाई जेऊर गावातील वाघवाडीत ही घटना घडलीय. लष्करातील जवान अशोक नामदेव वाघ हे सुट्टीवर आले होते. शेतीच्या वादातून त्यांच्यासह कुटुंबावर भावकी आणि शेजाऱ्यांनी सिनेस्टाईलने हल्ला केला. 10 ते 12 गुंडांनी हातात लाकडी दांडके, कोयता, कुऱ्हाड अशा तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला.

जवानाचा मृत्यू, आठ जण जखमी

या हल्ल्यात जवान अशोक वाघ यांच्यासह कुटुंबातील आठ जण जखमी झालेत. जखमींवर अहमदनगरचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या कित्येक दिवसांपासून गुंडांचा हैदोस सुरू आहे. मात्र एमआयडीसी पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.

गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी

या घटने संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावगुंडांचा बंदोबस्त त्वरित करावा. अन्यथा मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दोन गटात झालेला हा वाद भयानक होता. लाठ्या काठ्या घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. या राड्यामुळे गावातील वातावरण दूषित झाले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केला असला तरी हा वाद आणखी किती दिवस पेटत राहणार काही सांगता येत नाही. त्यामुळे पोलिसांना वाद शांत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......