AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virar Accident: मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात; अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

शिवधारी यादव यांचा टँकर खराब झाल्याने रस्त्यालगत त्यांनी आपला टँकर लावून टायराला दगड लावण्यासाठी खाली उतरले होते. याच वेळेस अशोककुमार यादव हा आपला टँकर भरगाव वेगात गुजरातच्या लेनवरून जात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने उभा असलेल्या टँकरवर जाऊन आदळला.

Virar Accident: मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात; अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू
मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 06, 2022 | 7:12 PM
Share

विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑईल टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही टँकर चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. विरार हद्दीत शिरसाड फाटा येथे आज दुपारी साडे तीन वाजता गुजरात लेनवर ही घटना घडली आहे. विरार मांडवी परिक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अशोककुमार आमरजित पाल (48) , शिवधारी हारकू यादव (48) असे अपघातात मृत्यू झालेल्या टँकर चालकांची नाव आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशचे राहणारे असून कामानिमित्त महाराष्ट्रात वास्तव्यास होते.

एका टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

शिवधारी यादव यांचा टँकर खराब झाल्याने रस्त्यालगत त्यांनी आपला टँकर लावून टायराला दगड लावण्यासाठी खाली उतरले होते. याच वेळेस अशोककुमार यादव हा आपला टँकर भरगाव वेगात गुजरातच्या लेनवरून जात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने उभा असलेल्या टँकरवर जाऊन आदळला आहे. या अपघातात टँकरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून दोन्ही टँकर चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टँकर अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ACP रामचंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ, यांच्यासह पोलीस हवालदार युवराज जाधव, पो. ना हनुमंत डोईफोडे, पो. कॉ रामदास घुगे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, तात्काळ टँकर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून, मृतदेह हे शवविच्छेदनसाठी पाठविले आहेत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

नंदुरबारमध्येही गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

पिक अप गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे घडली आहे. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. सर्व जण मजूर असून गोरांबा येथील रहिवासी आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी धडगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इतर बातम्या

Delhi Crime: जॅकेट परत केले नाही म्हणून मित्राची हत्या, दिल्लीतील धक्कादायक घटना

Pune crime | ‘या’ गुन्हयांतर्गत अंर्तगत रवींद्र बर्‍हाटेला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली