मोठी बातमी ! येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट; लॉजिकही सांगितलं

नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला?

मोठी बातमी ! येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट; लॉजिकही सांगितलं
narayan raneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 1:59 PM

सिंधुदुर्ग : कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दोन्हीकडून एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक रंगत असते. त्यामुळे कोकणातील राजकारण सतत तापलेलं असतं. आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार आहे, असा गौप्यस्फोटच वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या विधानामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

येत्या दोन महिन्यात राणेंच मंत्रिपद जाणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे, असं वैभव नाईक म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. नाईक यांनी राणेंचं मंत्रिपद का जाणार याचं कारणही सांगितलं. त्यावर ना भाजपकडून प्रतिक्रिया आलीय, ना नितेश राणे किंवा निलेश राणे यांच्याकडून. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

वडिलांना आधी विचारा

यावेळी ईडीच्या चौकश्यांवरून त्यांनी टीका केली. नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

राऊतांचाही दावा

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला होता. नारायण राणे हे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खात्याचे मंत्री आहेत. त्यांचं मंत्रिपद जाणार आहे. कारण शिंदे गटाच्या लोकांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार?

दरम्यान, 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा छोटा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारात शिंदे गटाला मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाकडून गजानन कीर्तीकर यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची चर्चाही होती. मात्र, या वृत्ताला अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.