AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसई, विरार आणि पालघरमध्ये सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल बंद, फक्त अत्यावश्यक वाहनांना पेट्रोल मिळणार

वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला (Petrol Diesel  Limit Palghar) आहे.

वसई, विरार आणि पालघरमध्ये सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल बंद, फक्त अत्यावश्यक वाहनांना पेट्रोल मिळणार
| Updated on: Apr 09, 2020 | 11:59 AM
Share

पालघर : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात (Petrol Diesel  Limit Palghar) आहे. मात्र तरीही अनेक जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागण्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल विक्री बंद ठेवण्याचा घेतला आहे.

अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या वाहनांच्या रांगा (Petrol Diesel  Limit Palghar) लागत आहे. यातील काही वाहनांवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. तरीही अनावश्यकपणे फिरण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे या परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहने सोडून इतरांसाठी पेट्रोल डिझेल विक्री बंद करण्यात येणार आहे.

पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी 8 मार्च रोजी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार आत्यावशक सेवा वगळता अन्य कुणालाही पेट्रोल डीझेल न देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत सर्वसामान्यांना पेट्रोल डीझेल विक्री शहरात बंद राहणार आहे.

वसई विरार परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहेत. तसेच शहरातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल डीझेल भरण्यासाठी मोठ गर्दी होत त्यामुळे शहरात कोरोन विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला (Petrol Diesel  Limit Palghar) आहे.

राज्यात कोरोनाचे 1135 रुग्ण

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,135 वर येऊन पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत 748 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला (Kem Doctor Corona Positive) आहे.

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.