
Narendra Modi On BMC Election Result 2026 : मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाने एकत्र येत पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती. काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायची, असा निश्चयच महायुतीच्या या दोन्ही घटकपक्षांनी केला होता. दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरे यांनीही ऐतिहासिक युती करून मराठी अस्मितेच्या माध्यमातून वातावरण तापवले होते. परंतु आता मुंबईत महायुतीची सरशी झालेली असून महापौर निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहेत. त्यामुळेच मुंबईचा नवा महापौर कोण होणार, याबाबतच सस्पेन्स वाढला आहे. असे असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या निकालावर मोठे भाष्य केले आहे.
नरेंद्र मोदी आसाम राज्यातील काझीरंगा येथे एका सभेला संबोधित करत होते. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीवर थेट भाष्य केले. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “संपूर्ण देशात भाजपा हा सर्वांचा आवडता पक्ष म्हणून समोर येत आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोकांचा भाजपावरील विश्वास वाढत आहे. नुकेच बिहारमध्ये निवडणुका झाल्या. तिथे लोकांनी भाजपाला विक्रमी मतं दिली,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
तसेच पुढे त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही मोठे भाष्य केले. “दोन दिवसांअगोदर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत महापौर आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्या. मुंबई हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. त्या शहरातही जनतेने भाजपाला पहिल्यांदाच ऐतिहासिक आणि विक्रमी मतं दिली. भाजपाचा मुंबईत विजय होतोय. पण तो विजय काझिरंगामध्ये साजरा केला जातोय. महाराष्ट्रात बहुसंख्य शहरात लोकांनी भाजपालाच सेवेची संधी दिली आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीवर थेट मोदींनी आसाम राज्यात विधानांची चर्चा होत आहे. सद्या भाजपा आणि शिवसेना यांच्यात महापौरपदाच्या निवडीवरून चर्चा सुरू आहे. असे असतानाच मोदी यांनी थेट आसाममध्ये मुंबईचा उल्लेख केल्याने भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांचेही महापौरनिवडीकडे लक्ष आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.