AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रहार जनशक्ती आणि वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाकडून मिळालं हे चिन्ह

राज्यातील दोन महत्त्वाचे पक्ष बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाकडून चिन्ह जाहीर करण्यात आलं आहे. दोन्ही पक्षांना काय चिन्ह मिळालंय जाणून घ्या.

प्रहार जनशक्ती आणि वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाकडून मिळालं हे चिन्ह
| Updated on: Aug 16, 2024 | 3:15 PM
Share

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह मिळाले आहे. यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा कप बशी चिन्हावर निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत प्रहारला शिट्टी हे चिन्ह मिळालं होतं. यानंतर आता प्रहार पक्षाला पुढच्या निवडणुका बॅट या चिन्हावर लढवाव्या लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रहार जनशक्ती पक्षाला हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे प्रहार पक्ष आता विधानसभा निवडणुका बॅट या चिन्हावर लढवू शकते.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे. तर भारत आदिवासी पक्षाला हॉकी आणि बॅट हे चिन्ह मिळाले आहे. महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन्ही पक्षाला राज्यातील काही भागात होणार मतदान मोठं आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षाला मिळालेल्या या चिन्हावर निवडणूक लढवता येणार आहे.

राज्यात विधानभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन होणार आहे. नवीन सरकार स्थापन होण्यासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा निकाल लागणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात 2019 ते 2024 या काळात राज्याने अनेक राजकीय भूकंप पाहिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झालीये. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक खूप महत्त्वाची मानली जातेय. मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

राज्यातील 288 जागांच्या विधानसभेत 2019 च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.