AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, माझ्यावरील संकट आघाडी निर्मित-दरेकर

कारवाईला सुरूवात झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही कारवाई सूडबुद्धीने करत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. तसेच आज दरेकरांनी आज पुन्हा तोच आरोप केलाय.

तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, माझ्यावरील संकट आघाडी निर्मित-दरेकर
भाजप नेते प्रवीण दरेकरImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 5:18 PM
Share

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकरांवर (Pravin Darekar) सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे त्यांचं आणि भाजपचं टेन्शन वाढलं आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयानं विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रविण दरेकर यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. प्रविण दरेकर यांच्यावर तोपर्यंत कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या कारवाईला सुरूवात झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही कारवाई सूडबुद्धीने करत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. तसेच आज दरेकरांनी आज पुन्हा तोच आरोप केलाय. माझ्या वरच संकट हे महाविकास आघाडी निर्मित संकट आहे. आणि तसेही मी त्याला संकट मानत नाही. न्याय व्यवस्था सत्याच्या बाजूने उभी असते. असे म्हणत महाविकास आघाडीला प्रतिआव्हान दिलंय.

उसळी मारून पुढे येईन

तसेच सोमवारी सुनावणीनंतर सत्य समोर येईल. माझ्यावर कसलेही दडपण नाही, मी घाबरणाऱ्यातला नाही, असेही दरेकर म्हणाले आहेत. तसेच जेवढं दडपण आणण्याचा प्रयत्न कराल तेवढी उसळी मारुन पुढे येईन, विधान परिषदेत पूर्ण ताकदीने लोकांचे प्रश्न मांडत राहणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीलाही नापास विद्यार्थी म्हणत पुन्हा डिवचलं आहे. तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. जयंत पाटलांनी हे तर त्यांनी मान्य केले की आम्ही सरकार पडणार नाही, ह्यांचे आपआपसातले वाद आहेत. राज्य आज वाऱ्यावर पडलं आहे, सक्षम नेतृत्वाची आज गरज आहे आणि तो पर्यया फक्त भाजप आहे, असेही दरेकर म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार

तसेच शरद पवार यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेताला आहे. शरद पवार पक्ष वाढवण्याचे काम करू शकतात. मात्र आगामी निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल. पंतप्रधान मोदी यांच्यासारखे नेतृत्व पूर्ण देशात नाही, असे म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गेल्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजपचे सरकार आलेच होते, पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे तिन्ही वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सोबत आले. अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांना आत्मपरिक्षणाचाही सल्ला दिला आहे.

Sharad Pawar यांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, रावसाहेब दानवे यांचं टीकास्त्र

विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा नाही, मलिकांच्या राजीनाम्याला पुन्हा धार्मिक रंग

आमचा रंग ओरिजनल , दाऊदच्या माणसाला साथ देणाऱ्या शिवसेनेचा रंग फिका, रावसाहेब दानवेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.