AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना पुन्हा ते ‘सिंहासन’ नाही? मविआच्या बैठकीत मोठी मागणी, काय आहे नेमकं?

पुण्यातील वज्रमूठ सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्याकडे आहे. आज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात मविआ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा ते 'सिंहासन' नाही? मविआच्या बैठकीत मोठी मागणी, काय आहे नेमकं?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 08, 2023 | 1:37 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : शिंदे-भाजप युती सरकार पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) एकजुटीने राज्यभरात सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांना संभाजीनगरातून दणदणीत सुरुवात झाली. तर पुढची सभा पुण्यात होतेय. संभाजीनगरात उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील या नेत्यांची भाषणं गाजली. मात्र एका गोष्टीची जास्त चर्चा झाली. सभेतील व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. इतर खुर्च्यांपेक्षा वेगळी आणि उंच खुर्ची होती. त्यामुळे महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे असेल का? त्यांना विशेष खुर्ची देण्यात आली ती ‘सिंहासन’ होतं.., अशा चर्चा घडू लागल्या. या चर्चा टाळण्यासाठी पुण्यातील सभेत मोठी खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात ती चूक टाळणार?

संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकारची खुर्ची देण्यात आली होती. वज्रमूठ सभेत असा कोणताही भेदभाव झालेली नाही, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र पुण्यातील सभेत ही चूक टाळली जावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं समोर आलंय.

पुण्यात कधी सभा?

पुण्यात वज्रमूठ सभेचं आयोजन १४ मे रोजी करण्यात आलंय.या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरुन विविध चर्चा सुरु झाल्यानंतर आता पुण्यातील सभेत स्टेजवर एकाच प्रकारच्या खुर्च्या ठेवाव्या, अशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठकीत मागणी असल्याचं समोर आलंय.

या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्याकडे आहे. आज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात मविआ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे.

‘सिंहासन नव्हे ती टेकण्याची सोय’

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवरून खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंना देण्यात आलेली खुर्ची सिंहासन म्हटलं गेलं, मात्र ती त्यांना टेकण्यासाठीची सोय असल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!