AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर तुला काय त्रास आहे?; अजितदादांनी उडवली टर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारसूला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच बारसू प्रकरणी आंदोलकांवर लाठीमार करू नका. त्यांच्याशी चर्चा करा. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मार्ग काढा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.

गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर तुला काय त्रास आहे?; अजितदादांनी उडवली टर
| Edited By: | Updated on: Apr 29, 2023 | 9:31 AM
Share

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा मुळशीत नृत्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गौतमी हिने बैलासमोर डान्स केला. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. चक्क बैलासमोर गौतमी नाचल्याने त्याची चर्चाही सुरू झाली आहे. एका पत्रकाराने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना याबाबतच प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत या प्रश्नाचीच टर उडवली. यावेळी अजित पवार यांनी बारसूतील आंदोलनापासून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरील विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

गौतमी पाटील बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास आहे? तिचं काम आहे ती करणार. बैल गाडामध्ये पहिला आलेला हा बैल आहे. त्यासाठीच हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. असं तिला सांगितलं असेल. त्यामुळे तिनेही नृत्य करण्यास होकार दिला असेल. त्यामुळे कुणाला त्रास होण्याचं काय कारण आहे, असा चिमटा अजित पवार यांनी काढला. बारामतीमध्ये अवकाळी पाऊस आहे. हवामान खात्याने अजून गारपिट होणार असल्याचं सांगितलं आहे. ज्या शेतात पीक आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री सांगतात ताबडतोब मदत करेल. पण शेतकऱ्यांना मदत होत नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करायला हवी, असं एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले.

बारसूत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे बघितलं पाहिजे. उदय सामंत यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं की तिथल्या लोकांचा कुठल्या गोष्टीला विरोध आहे हे विचारायला हवं. तिथल्या लोकांचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो म्हणून हा विरोध आहे का? का इतर कारण आहेत? हे बघायला हवं. लाखो लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. पण परिसरातील कायमचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा विचार करायला हवा, असं ते म्हणाले.

चर्चा करून निर्णय घ्या

राजन साळवी यांनी केलेलं वक्तव्य मी पाहिलेलं आहे. साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार राहिले आहेत. साळवी यांनी बारसूला पाठिंबा दिला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल आणि त्या ठिकाणी असलेल्या जनजीवनावर जर परिणाम होणार नसेल तर प्रकल्पावर सर्वांशी बोलून चर्चा करावी. जे विरोध करत आहेत त्यांना विश्वासात घ्यायला हवं. उद्धव साहेब म्हणाले आहेत मी जनते सोबत आहे. राष्ट्रवादी ची भूमिका विकासाबाबत नेहमी सकारात्मक राहिली आहे. अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले आपण पाहिले. पण यातून जर रोजगार येऊन आणि तिथे वातावरण आणि निसर्गाला बाधा येणार नसेल तर शहानिशा करायला हवी, असं त्यांनी सांगितलं.

भोपाळची पुनरावृत्ती नको

स्वतः उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने भोपाळची पुनरावृत्ती व्हायला नको. काही लोकांनी बारसूमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज सारखे प्रकार होऊ नये. नागरिकांना बैठीकला बोलवायला हवं. लोकांच्या शंकांचं निरसन होईपर्यंत सर्व्हेक्षण थांबवा असं मी म्हणालो होतो. गरज पडली तर सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी. जन सुनावणी घ्यावीच लागेल. मी बारसू ला जायचं ठरवले नाही पण वेळ पडली तर जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

बॅनर लावू नका

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनर्स लागले आहेत. त्यावर बोलताना अजितदादांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. माझे बॅनर लावू नका. असे बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. 145 मॅजिक फिगर लागते. एकनाथ शिंदे यांनी युक्ती लढवून ती मिळवली आणि मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे बॅनरबाजी करू नका, असं पवार म्हणाले.

Follow Us
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.