AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणून पक्ष्यांची वसाहत नष्ट झाली, कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांचा गंभीर आरोप

चिंचेच झाडं हे पुरातन होतं. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे झाडं होतं. त्या झाडावर राहणाऱ्यांचं मोठं कुटुंब होतं.

म्हणून पक्ष्यांची वसाहत नष्ट झाली, कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांचा गंभीर आरोप
| Updated on: Jun 26, 2023 | 7:54 PM
Share

पुणे : शासनाच्या नियमानुसार पन्नास वर्षाच्या पुढील वृक्षांला हेरिटेज स्वरूपाचे आहे असं मानण्यात येते. त्या झाडाचे संवर्धन झाले पाहिजे. परंतु इंदापूरचे मुख्याधिकारी यांनी झाड का कापले? कोणत्या उद्देशाने झाड कापले ? याच कारण अद्यापही समजले नाही. इंदापूर शहरातील गडीवरील शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाडण्यात आले. त्यावेळी योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. यामध्ये देशी विदेशी पक्ष्यांची मोठी वसाहत नष्ट झाली. शेकडो चित्रबलाक पक्ष्यांचा आणि वटवाघूळ यांचा मृत्यू झाला. ही वृक्षतोड नव्हे तर ही झाडाची झालेली हत्या आहे. याबाबत इंदापूर नागरी संघर्ष समिती काम करीत आहेत. झाडाच्या हत्तेबद्दल कारवाई व्हावी, यासाठी सगळेजण प्रयत्न करीत आहेत.

पक्ष्यांना कचऱ्याच्या डेपोमध्ये जाळण्यात आले

चिंचेच झाडं हे पुरातन होतं. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे झाडं होतं. त्या झाडावर राहणाऱ्यांचं मोठं कुटुंब होतं. झाड कापल्यामुळं अख्ख कुटुंब उद्धवस्थ झालं. या कुटुंबात अनेक पशुपक्षी होते. चिंचेच्या झाडावर १०० पेक्षा जास्त वटवाघूळचा अधिवास होता. अनेक फ्लमिंगो पक्ष्यांचा अधिवास होता. मुख्याधिकारी आणि त्यांच्या टीमने सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी पक्ष्यांना कचऱ्याच्या डेपोमध्ये गाढण्यात आले.

प्रकरण हरित लवादाकडे जाणार

याच्यामध्ये वटवाघुळ किंवा फ्लेमिंगो पक्षाची चोच आहे. याला फार मोठी मेडिकल किंमत आहे. यामुळे मुख्याधिकारी यांनी यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार केला. बेकायदेशीर स्वरूपाचं काम केलेलं आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे प्रकरण लवकरच इंदापूर कोर्टामध्ये तसेच राष्ट्रीय हरित लवाद याच्यामध्ये दाखल केले जाणार आहे. अशी माहिती कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.