AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांचा दुष्काळी दौरा; म्हणाले, नुसती शेती एके शेती…

NCP Leader Sharad Pawar Dushkal Daura : शरद पवार सध्या बारामती आणि परिसरात दुष्काळी दौरा करत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना शेती करताना कोणती काळजी घ्यावी? यावर भाष्य केलं आहे. शरद पवार पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांचा दुष्काळी दौरा; म्हणाले, नुसती शेती एके शेती...
शरद पवारImage Credit source: Sharad Pawar Facebook
| Edited By: | Updated on: Jun 12, 2024 | 8:32 PM
Share

लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी दौरा सुरु केल आहे. शरद पवारांनी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील गावांना शरद पवार भेटी देत आहेत. पुरंदर तालुक्यातील वाल्हे, नीरा या गावांना भेटी दिल्यानंतर पवार पुरंदर तालुक्यातील कोळविहरे गावात पाहणी करत आहेत. शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा शेतीसोबतच जोडधंदा करण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला. नुसतं शेती एक शेती करून चालणार नाही. इतरही व्यवसाय करावे लागतील. एमआयडीसी तरूणांना रोजगार देते.एमआयडीसीला पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले.

पवारांचा शेतकऱ्यांशी संवाद

पुरंदर तालुक्यातील कोळविहरे गावात शरद पवार पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेती आणि जोडधंदा यावर शरद पवारांनी स्थानिकांना मार्गदर्शन केलं. दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजना काय करता येईल. संदर्भात माहिती घेण्यासाठी मी आलोय. राज्य सरकारकडे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संयुक्त बैठक घेणार आहे. वातावरण बदलले आहे मात्र समाधानकारक नाही. निवडणूक झाली तुम्ही काही कमतरता पडू दिली नाही. पावसाची कमतरता आहे मात्र मतांची पडू दिली नाही. मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हे प्रश्न कायमस्वरूपी कसे सोडवता येईल. याबाबत आग्रह धरू, असं शरद पवार म्हणाले.

जोडधंदा करण्याचा सल्ला

पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर होते. पुण्याला कारखाना द्यायचा नाही. कारखाना द्यायचा असेल तर बाहेर द्यायचा असा निर्णय मी त्यावेळी घेतला होता. शेती एक शेती करून चालणार नाही. एमआयडीसीला पर्याय नाही. याबाबत राज्य सरकारशी उद्योग खात्याशी चर्चा करणार आहे. जिथे शक्य आहे तिथे एमआयडीसी आणणार आहे. देशात सरकार आलं. यावेळी आलेले सरकार दुसऱ्याची मदत घेऊन आलं आहे. हे सरकार फार दिवस राहील असं वाटत नाही. कालच्या निवडणुकीत जी मदत केली तीच मदत येणाऱ्या निवडणुकीत पण करा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

स्थानिकांची पवारांपुढे कैफियत

पुरंदर तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यात स्थानिकांनी शरद पवारांपुढे कैफियत मांडली. या भागात नेत्यांच्या जमिनी आहेत. विजय शिवतारे यांची 450 एकर जमीन आहे. तर अशोक टेकवडे यांची 500 एकर जमिनी आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा मारला असा आरोप स्थानिकांनी केला. यावर मार्ग काढण्याचं आवाहन स्थानिकांनी शरद पवारांना केलं. त्यावर नेत्यांचे गाव असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.