AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुमत असतानाही भाजपनं इंदापूरच्या ग्रामपंचायतीची सत्ता गमावली! कारण काय?

इंदापूर तालुक्याच्या कळंब गावात बहुमत असलेल्या भाजपच्या एका सदस्याच्या चुकीमुळे पाच वर्षांची हाती आलेली सत्ता भाजपला गमवावी लागली आहे (BJP lose power in Indapur Kalamb gram panchayat despite majority)

बहुमत असतानाही भाजपनं इंदापूरच्या ग्रामपंचायतीची सत्ता गमावली! कारण काय?
| Updated on: Feb 09, 2021 | 9:03 PM
Share

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या कळंब गावात बहुमत असलेल्या भाजपच्या एका सदस्याच्या चुकीमुळे पाच वर्षांची हाती आलेली सत्ता भाजपला गमवावी लागली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. याउलट निकालावेळी निराश झालेल्या राष्ट्रवादीला ऐतिहासिक लॉटरी लागल्याने त्यांच्या गोटात कमालीचा आनंद दिसत आहे. इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात सरपंच पदाच्या निवडणुकीत कदाचित अशी घटना झालेली नसावी (BJP lose power in Indapur Kalamb gram panchayat despite majority).

राजकारणातील एक चूक किती महागात पडते याचा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील भाजप पक्षाला आला आहे. त्याचं झालं असं, कळंब गावची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली होती. यामध्ये भाजप पुरस्कृत पॅनलला नऊ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला आठ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरपंचपदाचा दावा केला होता.

त्यानंतर भाजपच्या अनिता नंदकुमार सोनवणे यांनी आज (9 फेब्रुवारी) कळंब गावाच्या सरपंचपदासाठी अर्ज भरला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अतुल सावंत यांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत 17 जणांनी मतदान केले. मात्र एका मतदाराने दोन्हीही उमेदवाराच्या समोर खुणा केल्यामुळे त्याचे मतदान बाद झालं.

दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्यानंतर कळंब ग्रामपंचायतीच्या समोरील लहान मुलगा रुद्र दिपक चव्हाण याला बोलावून दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराची चिठ्ठी काढण्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. त्याने विद्या अतुल सावंत यांच्या नावाची चिठ्ठी काढल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

त्यानंतर उपसरपंचपदी निवडणुकीत भाजपाच्या लक्ष्मण पालवे यांना 17 पैकी 9 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र कल्याण डोंबाळे यांना 8 मते पडली. त्यामुळे कळंब ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अतुल सावंत यांची तर उपसरपंचपदी भाजपच्या लक्ष्मण पालवे यांची निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पुजारी यांनी दिली.

सरपंच पदाच्या निवडणुकीत काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराची चिट्ठी निघाल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची लॉटरी राष्ट्रवादीला लागली. तर बहुमतातील भाजपला केवळ उपसरपंच पदावर समाधान मानावे लागले (BJP lose power in Indapur Kalamb gram panchayat despite majority).

हेही वाचा : ‘गणेश नाईक म्हणजे बुडतं जहाज, आमचे नगरसेवक त्यांच्याकडे जायचा मूर्खपणा करणार नाहीत’

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.