AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीला फायद्यात आणण्यासाठी अजित पवार यांनी सांगितला प्लॅन, कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत म्हणाले…

Ajit Pawar on ST Bus: देशातील कोणतीही सार्वजिनक प्रवाशी संस्था फायद्याची नसते. परंतु सर्वसामान्यांना किफायतीशी भाड्यात प्रवास करता यावा, यासाठी या संस्था महत्वाच्या असतात. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांवर चर्चा सुरु आहे.

एसटीला फायद्यात आणण्यासाठी अजित पवार यांनी सांगितला प्लॅन, कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत म्हणाले...
Ajit Pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 12, 2025 | 7:43 AM
Share

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नाही. कर्मचाऱ्यांना केवळ ५६ टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरित ४४ टक्के रक्कम देण्याबाबत एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या प्रश्नावर अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगाराची माहिती घेतो. परंतु एसटीला शासनाकडून नेहमी मदत दिली जातो. कोरोनाकाळातही एसटी महामंडळाला शासनाकडून २५० ते ३०० कोटी रुपये दिले जात होते. तसेच एसटी मोफत प्रवास योजनेसाठी किंवा इतर विविध सवलतीच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्या योजनांचा पैसे शासनाकडून एसटीला दिले जातात, असे अजित पवार यांनी सांगितले.

एसटीच्या आगामी योजनांची माहिती देताना अजित पवार म्हणाले, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई व्हिईकल घेण्याचा प्रस्ताव आणला आहे. तो मंजूर होणार आहे. देशातील कोणतीही सार्वजिनक प्रवाशी संस्था फायद्याची नसते. परंतु सर्वसामान्यांना किफायतीशी भाड्यात प्रवास करता यावा, यासाठी या संस्था महत्वाच्या असतात. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांवर चर्चा सुरु आहे. एसटीची जागा अनेक शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे. ती जागा बीओटी तत्वावर देऊन उत्पन्न वाढण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ६० वर्षांचा करार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो करार ३० वर्ष वाढवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

मंगेशकर रुग्णालयाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता राज्यात धर्मादाय हॉस्पिटल असेल तर त्याचा उल्लेख सक्तीचे करण्यात येणा आहे. धर्मादाय रुग्णालयात निधी असतो. तो निधी वापरत का नाही? तो निधी पुजेसाठी असतो का? असेही अजित पवार म्हणाले.

महात्मा फुले यांच्या स्मारकाबाबत अजित पवार म्हणाले, फुले वाड्यात चांगले स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. स्मारकाच्या कामात कोणतेही राजकारण आणायचे नाही. याबाबत भुजबळ साहेबांशी मी चर्चा करणार आहे. त्यांना उपोषणास बसण्याची वेळ येणार नाही, अशी काळजी आम्ही घेऊ, असे अजित पवार यांनी म्हटले.

Follow Us
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...