Deepak Kesarkar : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंविषयी बोलणं टाळतो’, पुण्यात दीपक केसरकरांनी सांगितलं खरं कारण

विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळेच ते अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. तर मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीही नाराज नाही, असे पुण्यात आले असता दीपक केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar : '...म्हणून उद्धव ठाकरेंविषयी बोलणं टाळतो', पुण्यात दीपक केसरकरांनी सांगितलं खरं कारण
दीपक केसरकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 1:29 PM

पुणे : कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षांपूर्वी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर करण्यात आला होता तो आरोप सिद्ध झाला नाही. एका समाजाचा मंत्रीपद द्यावे म्हणून बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्री यांनी पाळले, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले आहे. ते पुण्यात बोलत होते. वादग्रस्त संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून सध्या वादंग सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल. तसेच ही चौकशी निःपक्षपातीपणे होईल. परंतु जर दोषी नसतील तर मंत्रीपद का देऊ नये, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी बोलणे टाळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

‘कोणीही नाराज नाही’

संजय राठोड दोषी आढळले असते तर कारवाई झाली असती. बंजारा समाजाच्या भावना होत्या. त्यामुळेच संजय राठोड यांना मंत्रीपद दिले, असे केसरकर म्हणाले. संजय राठोड यांच्याविषयी मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही केले गेले. विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळेच ते अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. तर मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीही नाराज नाही. आधी म्हणत होते, गेलेले परत येतील, मात्र आमचे संख्याबळ वाढतच आहे. अनेकांची नाराजी होती. ती बाहेर आली. उठाव करायला धैर्य लागते. नाहीतर सर्वच्या सर्वच आले असते. मात्र तसे झाले नाही, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

विरोधकांवर दीपक केसरकरांची टीका

’10 हजार कोटींची वाढ’

मेट्रो प्रकल्पामध्ये 10 हजार कोटींची वाढ झाली आहे. हा बोजा जनतेवर पडत असतो. असे प्रकल्प थांबवून ठेवले तर किंमतीमध्ये वाढ होते. आरे मेट्रोमुळे प्रदुषण वाढणार नसून कमी होणार असल्याचा दावादेखील यावेळी केसरकर यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतची परवानगी दिली होती. पर्यावरण रक्षण झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काम केले जात आहे. यावरून

हे सुद्धा वाचा

‘उद्धव ठाकरेंबद्दल काहीच बोलत नाही’

मी उद्धवसाहेब यांच्याबाबत मी काहीच बोलत नाही नि काही बोललो तर टायटल होते, मी उद्धवसाहेब यांच्यावर टीका केली. मला ते नको आहे, म्हणून मी त्यांच्याबाबत बोलणे टाळतो, असेही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.