AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अजित दादांची गॅरंटी नाही’, निलम गोऱ्हेंच्या ‘त्या’ विधानानंतर गजानन काळेंचा खळबळजनक दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

'अजित दादांची गॅरंटी नाही', निलम गोऱ्हेंच्या 'त्या' विधानानंतर गजानन काळेंचा खळबळजनक दावा
| Updated on: Nov 06, 2022 | 9:16 PM
Share

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे काही अनपेक्षित राजकीय घडामोडी देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतील चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असूनही सहभागी झाले. पण त्याचवेळी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांची अनुपस्थिती बघायला मिळाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ‘अजित दादांची गॅरंटी नाही’ असं स्पष्ट विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे मनसे नेते गजानन काळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केलाय.

खरंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीवर गजानन काळे यांनी कालच धक्कादायक दावा केला होता. “शरद पवार आजारी असून कार्यक्रमात येतात. पण अजित पवार वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात हे पचनी पडत नाही. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा”, असं गजानन काळे म्हणाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली होती तेव्हा ते बरेच दिवस महाराष्ट्राबाहेर गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये थांबले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा सर्व आमदारांना गुवाहाटीला घेऊन जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. असं असताना अजित पवार यांच्या देखील नाराजीची चर्चा सुरुय. त्यामुळे अजित पवारही बंडखोरी करुन गुवाहाटीला जातात का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुय. त्याबाबतचा इशार गजानन काळे यांनी आधीच दिलाय. त्यानंतर त्यांनी आज निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत आपण खरं म्हणत असल्याचं म्हटलंय.

निलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या आहेत?

भाजपच्या पालकमंत्र्यांकडून विरोधकांना निधी दिला जात नाहीय का? असा काहीसा प्रश्न आज पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर निलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडताना अजित पवारांची गॅरंटी नाही, अशा प्रकारचं विधान केलं. पण त्यांच्या या विधानावरुन मनसे नेते गजानन काळे यांनी वेगळाच दावा केलाय.

“पूर्वी गिरीश बापट पालकमंत्री होते तेव्हा मला माहिती आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे, फक्त आरोप म्हणून आरोप करत नाहीय. गिरीश बापट राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने निधी द्यायचे. आता तसं राहीलं नाही. कारण आता बरंच पाणी वाहून गेलंय. महाविकास आघाडी तयार झालीय. त्याचबरोबर अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाहीय. परत त्यांना बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा आहे. पूर्वी जसे संताजी-धनाजी दिसायचे तसं आमची मविआ सहकारी दिसत आहेत. मला तर आमदार म्हणून अजिबात निधी दिला नव्हता. आम्ही काल-पर्वा खूप पाठपुरावा केल्यावर थोडाफार निधी देतो सांगितलं. तीन-तीन वर्ष कामं मंजूर झाल्यानंतरही निधी मिळत नव्हता”, अशी सविस्तर प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिलीय.

निलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाले ते व्हिडीओत पाहा:

(संबंधित व्हिडीओत सात वाजून पाचव्या मिनिटाला तुम्ही निलम गोऱ्हे यांनी याबाबतचं वक्तव्य केलेलं पाहू शकता)

निलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर गजानन काळे नेमकं काय म्हणाले?

“आम्ही तर कालच म्हणालो होतो आज निलम ताई गोऱ्हे पण म्हणाल्या अजित दादांची गॅरंटी नाही …”, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

“काँग्रेसने विरोधी पक्षनेते केले ते विखे पाटील पण असेच गेले होते आता या राज्याचा दुसरा विरोधी पक्ष नेतापण जाण्याची चिन्ह आहेत का?”, असा सवाल गजानन काळेंनी पुन्हा केला. “मंथन शिबिर जास्तच भारी पडलंय असं दिसतंय राष्ट्रवादीला …’, असा टोला गजानन काळेंनी लगावलाय.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.