AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पुण्यातील हा व्हिडिओ होतोय खूप व्हायरल, कशामुळे सुरु आहे आजी-आजोबांचा आनंदोत्सव

Pune Viral Video : पुणे तिथे काय उणे ! याचा प्रत्यय पुन्हा आला. ती लोक तब्बल ७० वर्षांनी एकत्र आली. मग दंगा, मस्ती झाली. नाच-गाणेही झाले. सुख-दु:खाच्या गप्पाही रंगल्या. अन् पुन्हा भेटण्याचा निर्णय झाला.

Video : पुण्यातील हा व्हिडिओ होतोय खूप व्हायरल, कशामुळे सुरु आहे आजी-आजोबांचा आनंदोत्सव
| Updated on: Jun 13, 2023 | 4:22 PM
Share

रणजित जाधव, पुणे : आनंद, उत्साह व्यक्त करण्यासाठी कधी वय आडवे येत नाही. फक्त निमित्त हवे असते. मग तब्बल ७० वर्षांनी एकत्र आल्यावर आनंद किती होणार? याची कल्पना तुम्हाला येणार नाही. पुण्यातील हे आजी- आजोबा आता जवळपास ८५ वर्ष वयाचे. सर्वांमध्ये एक कॉमन दुवा आहे. यामुळे ती मंडळी एकत्र आली अन् धमाल मस्ती केली. पुणे शहरातील या प्रकारामुळे पुणे तेथे काय उणे? असेच म्हणावे लागेल.

काय आहे विषय

सध्या सोशल मीडियामुळे जुने मित्र एकत्र येऊ लागले आहे. त्याचे स्नेह संमेलन होत आहे. परंतु ही मंडळी युवा..अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वी त्यांची शाळा किंवा कॉलेज संपले.  परंतु पुणे शहरात दहावीतील विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी गेट टुगेदर केले. परंतु हे दहावीचे विद्यार्थी १९५४ च्या बॅचचे होते. म्हणजेच तब्बल ७० वर्षांनी ही मंडळी एकत्र आली. कोणी राज्यात होते, कोणी देशाच्या दुसऱ्या शहरात होते. मग सर्वांना आठवले ते शाळेतील दिवस… सर्वांना लहानपण देग देवा…चा अनुभव आला. मग बिधधास्त होत गप्पा रंगल्या. गेम खेळले गेले. गाणी म्हटली गेली… अगदी किशोरवयीन असल्याचा अनुभव या मंडळींनी घेतला. अन् ८५ व्या वर्षी नाचलेसुद्धा…

शाळेतल्या आठवणींमध्ये रंगले

तब्बल ७० वर्षांनी सर्व जण एकत्र भेटले. मग गप्पांचा फडही रंगला. कोणी शाळेत असताना कसे होते, किती खोड्या करायचे, आपले शिक्षक-शिक्षिका कसे होते, शिक्षकांनी आपणास कसे घडवले…अशा गप्पा सुरु झाल्या. मग आजी-आजोबांचे मुले अन् नातवंडे यांची चर्चा झाली. वय विसरुन झालेली दंगा, मस्ती झाली. खाणेपिणे झाले. मग अशा या क्षणाचा एक धमाल व्हिडिओ काढला गेला अन् तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अन् पाहता पाहता तो प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी काँमेंट नोंदवल्या. या ग्रुपचे एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर पाहून मराठीतील दुनियादारी या चित्रपटाची आठवण झाली. अन् त्या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आठवला.. तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी…

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.