AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इचलकरंजीत मनसेच्या पाठपुराव्याने 50 सफाई कर्मचाऱ्यांना न्याय

इचलकरंजीत मनसेच्या पाठपुराव्याने 50 सफाई कर्मचाऱ्यांना राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी न्याय दिला.

इचलकरंजीत मनसेच्या पाठपुराव्याने 50 सफाई कर्मचाऱ्यांना न्याय
| Updated on: Jan 03, 2021 | 4:38 PM
Share

इचलकरंजी :  शहरातील आयजीएम रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन हॉस्पिटलच्या ठेकेदाराविरोधात तक्रार केली होती. यामध्ये मनसेची त्यांना भक्कम साथ मिळाली होती. आता राज्यमंत्री यड्रावकर यांनी कर्मचाऱ्यांची समस्येची दखल घेऊन 50 कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलाय. कर्मचाऱ्यांचा आवाज मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात टीव्ही 9 ने देखील महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे सफाई कर्मचारी आणि मनसेने टीव्ही 9 चे आभार मानले आहेत. (Ichalkaranjit Minister of State Rajendra Patil Yadravkar gave justice to 50 cleaning workers)

इचलकरंजीत आयजीएम हॉस्पिटल कोव्हिड-19 काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा आधार बनले होते. याठिकाणी पाच हजार रुग्णांनी कोरोना सारख्या महामारीवर मात केली आहे. मार्चपासून कोरोना चा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चालला होता. यावेळी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, सिस्टर व सफाई कर्मचारी यांची कमतरता होती. यावेळी राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट बेसवर रुग्णालयामध्ये स्टाफ भरून घेतला होता. त्यानुसार इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालयात देखील सुमारे 72 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली होती.

जिल्हा परिषदेच्या एका मतदानाद्वारे ही भरती करून घेण्यात आली होती. कोरोनाच्या काळामध्ये यांनी जीवाची पर्वा न करता आयजीएम रुग्णालय स्वच्छ व सुंदर ठेवले. त्या काळात त्या कर्मचाऱ्यांना बावीस दिवसाचा पगार दिला जात होता व आठ दिवसांचा पगार कट केला जात होता. शिवाय कर्मचाऱ्यांचा कोणताही विमा सुरक्षा कवच नव्हते. पुरुषांना प्रतिदिन तीनशे रुपये तर महिलांना अडीशे रुपये असा पगार देण्यात येत होता. ज्यादा ड्युटीचा पगार देखील ठेकेदार देत नव्हता. अशा सर्व तक्रारी घेऊन मनसेचं शिष्टमंडळ आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते.

त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून मनसेच्या वतीने याचा पाठपुरावा केला जात होता. या तक्रारीची दखल घेऊन आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी राज्यातील कोरोना काळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी काम केले आहे त्यांचा राहिलेला पगार देण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत.

यावेळी टीव्ही 9 च्या माध्यमातून आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून पाठपुरावा करत होतो आणि आज आम्हाला न्याय मिळाला. यानिमित्ताने आम्हाला टीव्ही 9 ची खंबीर साथ मिळाली, असे उद्गार मनसे जिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांनी काढले. तसंच कर्मचाऱ्यांनीही टीव्ही 9 चे आभार मानले. (Ichalkaranjit Minister of State Rajendra Patil Yadravkar gave justice to 50 cleaning workers)

हे ही वाचा

हातकणंगले पंचायत समिती सभापतींच्याविरोधात अविश्वास ठराव, काय होणार?

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी, दुचाक्या ढकलत निषेध

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.