AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याची दोन एकर मका पाण्यात, अधिकाऱ्यांनी दिली उडवा उडवीची उत्तरे…

विशाल झगडे यांच्या शेतात गेल्या सहा दिवसांपासून पाणी साचल्याने शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नीरा डाव्या कालव्यातून तालुक्यातील वडापुरी येथील तलावात पाणी सोडले जात आहे. तीन वर्षांपूर्वी येथील बंधारा फुटला होता.

पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याची दोन एकर मका पाण्यात, अधिकाऱ्यांनी दिली उडवा उडवीची उत्तरे...
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 8:38 AM
Share

इंदापूर : पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका इंदापूर (Indapur) तालुक्यातील शेतकऱ्याला बसलायं. इंदापूर तालुक्यातील झगडेवस्ती येथील शेतकरी विशाल झगडे यांच्या शेतातील दोन एकर मका पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे पाण्यात गेलायं. यामुळे विशाल यांच्या मक्याच्या पिकाचे मोठे नुकसान (Damage) झाले असून सहा दिवसांपासून शेतामध्ये पाणी साचल्याने मक्याचे पिक वाया जाण्याची वेळ आलीयं. यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून घडलेल्या प्रकरणा विषयी विचारण्यात आल्यास अधिकाऱ्यांकडून (officers) उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे झगडेवस्ती येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा संताप व्यक्त केलायं.

पाटबंधारे विभागाचे नियोजन फिसकले आणि थेट शेतात पाणी शिरले

विशाल झगडे यांच्या शेतात गेल्या सहा दिवसांपासून पाणी साचल्याने शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नीरा डाव्या कालव्यातून तालुक्यातील वडापुरी येथील तलावात पाणी सोडले जात आहे. तीन वर्षांपूर्वी येथील बंधारा फुटला होता. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तो बंधारा दुरुस्त करण्यात आला नाही. याच काळात लाखो रुपये खर्चून तलावात पाणी आणण्यासाठी वेगळ्या मार्गाने पाटाचे नियोजन केले होते.

शेतकऱ्याचे मोठे नुकसान, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे

तलावात पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने वेगळ्या मार्गाने पाटाचे नियोजन केले. मात्र, हे सर्व अयशस्वी झाले. यातून पाणी न आणता जुन्याच मार्गाने पाणी आणल्याने याचा मोठा तोटा शेतकऱ्याला बसला आणि सर्व पाणी विशाल झगडे यांच्या शेतात शिरले. शेतामध्ये दोन एकर मक्याचे पिक आता गेल्या सहा दिवसांपासून पाण्याखाली आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोयं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.