AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडले, सहा कंपन्यांवर केली मोठी कारवाई

इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधून रंगीत पाणी येत होते. त्यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यात सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्‍यांतील सांडपाणी नदीत सोडल्याचे आढळून आहे.

इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडले, सहा कंपन्यांवर केली मोठी कारवाई
इंद्रायणी नदी प्रदूषण
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Jan 29, 2023 | 11:01 AM
Share

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेने (pimpri chinchwad corporation) सहा कंपन्यांना मोठा दणका दिला आहे. इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सांडपाणी (Chmical Water) सोडले. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीचा (Indrayani river) प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत होता. टीव्ही ९ यासंदर्भात वारंवार वृत्त दिले होते. अखेरी मनपाने सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या जलनिःसारण विभागातर्फे तक्रार देण्यात आली होती.

तळवडेपासून डुडुळगावपर्यंत आणि आळंदी हद्दीपासून चऱ्होलीपर्यंत इंद्रायणी नदीची हद्द आहे. चिखलीपासून मोशीपर्यंत नदीच्या परिसरात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या पर्यावरण विभागाचे कोणतेही नियम पाळत नाही. भोसरी ‘MIDC’तील बहुतांश कंपन्यांचे सांडपाणी नदीत सोडले जात होते.

त्याचा परिणाम नदी प्रदूषित होत होती. अनेक सामाजिक संघटना  इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने मांडत होते. त्यानंतर महानगरापालिकेने पाहणी केली असता अनेक कंपन्या व लघुउद्योजकांनी कंपन्यांमधील सांडपाणी नदीत सोडल्याचे दिसून आले. या कंपन्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले.

कसा उघड झाला प्रकार

इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधून रंगीत पाणी येत होते. त्यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर जलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन व कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी पाहणी केली. त्यात सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्‍यांतील सांडपाणी नदीत सोडल्याचे आढळून आहे.

काय झाले होते

इंद्रायणी नदीवर बर्फाची चादर दिसत होती. एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे बर्फाची चादर दिसते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली होती. नदी पात्रात अनेक ठिकाणी फेसच-फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाली होती.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आळंदीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यांपूर्वी आले होते. त्यावेळी महेश महाराज मडके यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. तेव्हा मुख्यमंत्री यांनी नदी स्वच्छतेचे आश्वासन दिले होते.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा