AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : उगाच कशाला भिजत भाषण करा, भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंची शरद पवारांवर फिरकी

आपल्या सभांना काही हॉल परवडत नाही. पण मी कार्यकर्त्यांना सांगितले एसपी कॉलेज मिळते का बघा. त्यांनी नकार दिला. हल्ली आम्ही कुणाला देत नाही. ठीक आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : उगाच कशाला भिजत भाषण करा, भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंची शरद पवारांवर फिरकी
शरद पवार यांच्यावर टीका करताना राज ठाकरेImage Credit source: tv9
| Updated on: May 22, 2022 | 12:05 PM
Share

पुणे : हवामान (Weather) पाहता कोणत्याही वेळेला पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. काल मुंबईत पडला. म्हटले निवडणुका नाहीत. काही नाही. उगाच कशाला भिजत भाषण करा. निवडणुकांना वेळ आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांना टोला लगावला. ते पुण्यात बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आहे. ते म्हणाले, की आपल्या सभांना काही हॉल परवडत नाही. पण मी कार्यकर्त्यांना सांगितले एसपी कॉलेज मिळते का बघा. त्यांनी नकार दिला. हल्ली आम्ही कुणाला देत नाही. ठीक आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असेही ते म्हणाले.

अयोध्या दौऱ्यावरून भाजपावर हल्लाबोल

राज ठाकरे म्हणाले, की मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

‘आपल्याला राग येत नाही’

आपण बेसावध असतो. मराठ्यांचा इतिहास काळ वगळता इतर अनेक वर्ष आपण पारतंत्र्यात होतो. यासर्वांचा आपल्याला राग येत नाही. याचाच गैरफायदा सत्ताधारी घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली. आंदोलन करतच राहू. आमच्यावर कितीही केसेस झाल्या तरी, असा निर्धार त्यांनी केला. यासंबंधीचे पत्र घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.