AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बंडखोरीचा फटका बसला’, पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नाना काटे यांची पहिली प्रतिक्रिया

चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad by-election) पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्याला बंडकोरीचा फटका बसल्याचं मत मांडलं.

'बंडखोरीचा फटका बसला', पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नाना काटे यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Mar 02, 2023 | 7:21 PM
Share

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad By-Election Result) भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झालाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव झालाय. तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचादेखील पराभव झालाय. भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना या पोटनिवडणुकीत 1 लाख 35 हजार 494 मतं मिळाली. तर नाना काटे यांना 99 हजार 424 मतं मिळाली. दुसरीकडे राहुल कलाटे यांनी 40 हजार 75 मत मिळाली. या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी मविआ नेत्यांच्या आग्रहानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर आज चित्र वेगळं असतं. हीच उद्विग्नता नाना काटे यांनीही ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना व्यक्त केलीय.

चिंचडवड पोटनिवडणुकीतील पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय. चिंचवडमध्ये बंडखोरीचा फटका बसल्याचं ते म्हणाले आहेत. “सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार झालेला. बंडखोरीचा नक्कीच फटका बसलेला आहे. कारण ते मतदान देखील आमचंच आहे. त्यामध्ये काही वंचितचं देखील मतदान असू शकतं. ते मतदानदेखील महाविकास आघाडीचं आहे”, असं नाना काटे म्हणाले.

‘त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केलं’

“मतदानाचा आधी त्यांनी पूर्ण पोलिसांचं बळ वापरुन आमचे बरेच कार्यकर्ते उचलले होते. याशिवाय त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केलं होतं. पैशांचा वापर अतिशय जास्त प्रमाणात झालाय”, असा दावा नाना काटे यांनी केला. “ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत जात होते पुन्हा त्याच पद्धतीने संपूर्ण चिंचवड मतदारसंघात काम करतील. आम्ही पुन्हा एकदा जोमाने काम करु”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

यावेळी भाजप उमेदवाराच्या विजयामागे त्यांना मिळालेली सहानुभूती हे कारण आहे का? असा प्रश्न विचारला असता नाना काटे यांनी नाही असं उत्तर दिलं. “भाजप उमेदवारांना सहानुभूती असती तर त्यांनी पैसे वाटले नसते. सहानुभूतीचा विषय राहिलाच नव्हता. त्यामुळे त्यांना पराभवाची भीती वाटत होती”, असा दावा नाना काटे यांनी केला.

Follow Us
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.