AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुण्यातल्या पाचपैकी चार जणांना मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं, विविध वयोगटाच्या अभ्यासातून बाब उघड

सध्या सुरू असलेला साथीचा रोग आणि विलगीकरण, अस्थिरता आणि चिंता यांच्या प्रभावामुळे आपल्यापैकी अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, असे अभ्यासात समोर आले आहे.

Pune : पुण्यातल्या पाचपैकी चार जणांना मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं, विविध वयोगटाच्या अभ्यासातून बाब उघड
मानसिक आरोग्य, प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Aug 12, 2022 | 8:30 AM
Share

पुणे : प्रत्येक पाच व्यक्तींपैकी चार व्यक्तांना मानसिक आरोग्याच्या समस्येने (Mental health issue) ग्रासले आहे. सुमारे 80 टक्के रहिवाशांना मानसिक आरोग्याची समस्या जाणवत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एमपॉवर आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या (Aditya Birla Education Trust) पुढाकाराने अलीकडेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांचे याविषयी सर्वेक्षण केले. यात ही बाब उघड झाली आहे. पुण्यातील 85 टक्के स्त्रिया आणि 70 टक्के पुरुषांना मानसिक आरोग्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि नैराश्य हे स्त्रियांमध्ये सर्वात मोठे कारण आहे. तर चिंता आणि पॅनिक डिसऑर्डर हे पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. एमपॉवर (Mpower) पुणे मेंटल हेल्थ स्कोअरने 18 ते 24 वर्षे वयोगटातील (युवक आणि किशोरवयीन) 25 ते 40 वर्षे (प्रौढ आणि कार्यरत लोकसंख्या) आणि 60 वर्षे आणि त्यावरील (वृद्ध लोकसंख्या) निष्कर्षांचे मूल्यांकन केले.

‘दुर्लक्ष करता येणारा विषय नाही’

नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात, एमपॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्षा, डॉ. नीरजा बिर्ला म्हणाल्या, की एमपॉवर येथे आम्ही भारतातील मानसिक आरोग्याच्या चिंतेबद्दल जागरूकता निर्माण करणे, गरजू लोकांना मदत आणि सेवा मिळविण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. शहर-विशिष्ट मानसिक आरोग्य स्कोअरच्या लाँचद्वारे आम्ही प्रत्येकाला हे लक्षात आणू इच्छितो, की मानसिक आरोग्य आता दुर्लक्ष करता येणारा विषय नाही. मानसिक आरोग्याचा त्रास कोणत्याही वयोगटातील आणि आजूबाजूला कोणालाही होऊ शकतो.

‘वेळीच योग्य समुपदेशन हवे’

सध्या सुरू असलेला साथीचा रोग आणि विलगीकरण, अस्थिरता आणि चिंता यांच्या प्रभावामुळे आपल्यापैकी अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.या त्रासाला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हे मान्य करणे आणि योग्य व्यावसायिक मदत घेणे म्हणजेच समुपदेशन हा होय. कारण मानसिक आरोग्याच्या समस्यांसह जगणे केवळ एखाद्याच्या आनंदाचे जीवनच नकारात्मक नाही करत तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. कारण या बाबी अप्रत्यक्षपणे उत्पादकता आणि वाढीस बाधित करतात, असे बिर्ला म्हणाल्या.

‘मानसिक आरोग्याच्या समस्येने तरुणांना ग्रासले’

या सर्वेक्षणातून आणखी काही बाबी समोर आल्या आहेत. जसे की, 18 ते 24 वयोगटातील 88 टक्के तरूण मानसिक आरोग्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. पुण्यातील तरुणांमध्ये दिसणाऱ्या काही प्रमुख मानसिक आरोग्यावरील ताण म्हणजे मूड डिस्टर्बन्स आणि चिंता. अनेकांना पॅनिक डिसऑर्डर, अस्थिरता, गैरवर्तन आणि खुल्या नातेसंबंधांच्या समस्यांचा त्रास होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.