AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या घटली! काय आहे कारण?

गेल्या काही वर्षांत आयटीआय (ITI) प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल कमी झाल्याचं दिसत आहे. कारण, पुणे विभागात उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी झाली आहे.

यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या घटली! काय आहे कारण?
आयटीआय महाराष्ट्र
| Edited By: Ajinkya Guthe | Updated on: Aug 25, 2021 | 5:10 PM
Share

पुणे : दहावीनंतर काय करिअर करायचं असा प्रश्न येतो तेव्हा अनेक विद्यार्थी कौशल्यआधरित अभ्यासक्रमांना प्राधन्य देताना दिसतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आयटीआय (ITI) प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल कमी झाल्याचं दिसत आहे. कारण, पुणे विभागात उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी झाली आहे. (Pune division has reduced the number of students seeking admission to ITI due to corona lockdown)

ITI साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

वाढत्या औद्योगिकरणामुळे (Industrialisation) आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे आयटीआयच्या ठराविक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्यावर्षी राज्यातल्या 3 लाख 32 हजार 128 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा 2 लाख 17 हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन पद्धीतीने शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रशिक्षण देणाऱ्या आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असावी असं सांगण्यात येत आहे.

10 हजार 880 विद्यार्थ्यांचाच अर्ज कन्फर्म

मागच्या वर्षी पुणे जिल्ह्यातल्या 11 हजार 552 जागांसाठी 15 हजार 865 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, यावर्षी 11 हजार 200 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यातल्या 10 हजार 880 विद्यार्थ्यांनीच आपला अर्ज कन्फर्म केला आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.

आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी प्रयत्न

वाढत चाललेल्या औद्योगिकरणामुळे विद्यार्थ्यांना आयटीआयच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपबल्ध करून देण्यात आली आहे. आयटीआयला विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रोत्साहन अभियन राबवलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Job Alert | पुणे जिल्ह्यात टपाल विभाग नियुक्त करणार विमा एजंट, 7 सप्टेंबरला थेट मुलाखती, काय आहे पात्रता?

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?