यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या घटली! काय आहे कारण?

गेल्या काही वर्षांत आयटीआय (ITI) प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल कमी झाल्याचं दिसत आहे. कारण, पुणे विभागात उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी झाली आहे.

यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या घटली! काय आहे कारण?
आयटीआय महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 5:10 PM

पुणे : दहावीनंतर काय करिअर करायचं असा प्रश्न येतो तेव्हा अनेक विद्यार्थी कौशल्यआधरित अभ्यासक्रमांना प्राधन्य देताना दिसतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आयटीआय (ITI) प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल कमी झाल्याचं दिसत आहे. कारण, पुणे विभागात उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी झाली आहे. (Pune division has reduced the number of students seeking admission to ITI due to corona lockdown)

ITI साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

वाढत्या औद्योगिकरणामुळे (Industrialisation) आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे आयटीआयच्या ठराविक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्यावर्षी राज्यातल्या 3 लाख 32 हजार 128 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा 2 लाख 17 हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन पद्धीतीने शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रशिक्षण देणाऱ्या आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असावी असं सांगण्यात येत आहे.

10 हजार 880 विद्यार्थ्यांचाच अर्ज कन्फर्म

मागच्या वर्षी पुणे जिल्ह्यातल्या 11 हजार 552 जागांसाठी 15 हजार 865 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, यावर्षी 11 हजार 200 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यातल्या 10 हजार 880 विद्यार्थ्यांनीच आपला अर्ज कन्फर्म केला आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.

आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी प्रयत्न

वाढत चाललेल्या औद्योगिकरणामुळे विद्यार्थ्यांना आयटीआयच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपबल्ध करून देण्यात आली आहे. आयटीआयला विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रोत्साहन अभियन राबवलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Job Alert | पुणे जिल्ह्यात टपाल विभाग नियुक्त करणार विमा एजंट, 7 सप्टेंबरला थेट मुलाखती, काय आहे पात्रता?

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.