AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune water : आता भरारी पथकं पाहणार कुठे पाणी गळतंय ते! पुणे महापालिका आयुक्तांनी केली नियुक्ती, पाणीसमस्या होतेय तीव्र

एकीकडे पाणीटंचाईचे संकट शहरात असताना दुसरीकडे कालवा समितीत पुणे महापालिका सर्वाधिक पाणी वापर करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर त्याचवेळी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिका मेटाकुटीला आली आहे.

Pune water : आता भरारी पथकं पाहणार कुठे पाणी गळतंय ते! पुणे महापालिका आयुक्तांनी केली नियुक्ती, पाणीसमस्या होतेय तीव्र
पुढील आठवड्यात मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणारImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 5:04 PM
Share

पुणे : शहरातील पाणी टंचाई (Water shortage) आणि गळती शोधण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त (PMC commissioner) विक्रमकुमार यांनी या भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. बाणेर-बालेवाडी परिसरात सध्या या पथकांकडून पाणी पुरवठ्याची खातरजमा करण्यात येत आहे. सध्या उन्हामुळे (Summer) शहरातील पाण्याची मागणी वाढली आहे. जवळपास 1600 एमएलडीपर्यंत पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पथक आता काम करणार आहे. मागणी वाढल्यामुळे सहाजिकत महापालिकेवरचा ताणही वाढला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ही समस्या वाढत असून उग्र रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. आता आयुक्त विक्रमकुमार यांनी नेमलेल्या पथकांमार्फत याचा अभ्यास आणि पाहणी होणार आहे.

‘टेलएंड’ला पाणीपुरवठा तुलनेने कमी

एकीकडे पाणीटंचाईचे संकट शहरात असताना दुसरीकडे कालवा समितीत पुणे महापालिका सर्वाधिक पाणी वापर करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर त्याचवेळी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिका मेटाकुटीला आली आहे. शहराच्या ‘टेलएंड’ला पाणीपुरवठा तुलनेने कमी होत असल्याने तेथून सर्वाधित तक्रारी महापालिकेला प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नेमण्यात आलेली ही पथके पाण्याची गळती शोधण्याच काम सुरू करणार आहे.

टंचाई आणि आंदोलने

शहरातील पाणीटंचाई आणि टँकरमाफियांच्या विरोधात विविध संघटना मागच्या महिनाभरापासून आक्रमक झाल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेत बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन केले होते. तर राष्ट्रवादीने दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर या भागातील पाणीटंचाईच्या प्रश्नी आंदोलन करत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. शहराच्या विविध भागांत सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

रस्त्यांचीही सुरू आहेत कामे

शहराच्या अनेक भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक रहिवाशांना पाणीकपात किंवा कमी दाबाने पाणी मिळत आहे. दुरुस्तीचे काम असेल तरच पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता कधी पाणीगळती, तर कधी रस्त्याची कामे किंवा आणखी काही… मात्र पुणेकर पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. त्यावर उपाय काढण्याची मागणी होत आहे.

Follow Us
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली.
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.