AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महानगरपालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना ‘जोर का झटका’, काय आहे कारण?

Pune News : पुणे महानगरपालिकेत भरतीचा नवीन टप्पा सुरु होत असताना नुकताच रुजू झालेल्या तीन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली आहे. या अधिकाऱ्यांना सेवेतून सरळ बडतर्फ करण्यात आले आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना 'जोर का झटका', काय आहे कारण?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 20, 2023 | 8:29 AM
Share

योगेश बोरसे, पुणे : पुणे महानगरपालिकेने आपल्या तीन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. कारवाई झालेले अधिकारी कनिष्ठ अभियंता आहे. या तिघांना सरळ बडतर्फ करण्यात आले आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी अन् अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या तिन्ही अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली.

काय आहे कारण

राज्यभरातील महापालिकांमधील कर्मचारी भरतीवर बंदी होती. राज्य सरकारने ही बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदा पुणे महापालिकेने भरती सुरू झाली. महानगरापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून भरती सुरु करण्यात आली होती. यामध्ये निवड झालेल्या काही जणांची प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यामुळे यासंदर्भात तीन अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीकडून कनिष्ठ अभियंता म्हणून भरती झालेल्या 50 जणांची कागदपत्रे तपासण्यात आली. त्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला.

काय आहे अहवालात

चौकशी समितीच्या अहवालानुसार तीन कनिष्ठ अभियंत्यांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या तीन कनिष्ठ अभियंत्यांना महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले. या तिघांवर पालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे खोटे पुरावे सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप आहे. या कारवाईमुळे महानगरपालिकेत खळबळ माजली आहे.

आता पुन्हा भरती प्रक्रिया

पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १५० जागा रिक्त आहे. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आयुक्त विक्रमकुमार यांनी दिला. या जागांसाठी साधारण जुलैअखेर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महानगरपालिकेत काही गावांचा समावेश झाला आहे. ही गावे अन् कार्यकारी अभियंता या पदावर भरतीसाठी आकृतीबंधात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर लगेचच भरतीप्रक्रिया सुरु होईल. या भरतीत कनिष्ठ अभियंता वर्गाची १५० आणि कार्यकारी अभियंता पदाच्या नऊ ते १० जागा असतील.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.