AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पोलिसांची धडक कारवाई, गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतली ही मोठी ॲक्शन

Pune Crime News : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे यासंदर्भात आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. शहरातील गुन्हेगारी मोडण्यासाठी पुणे पोलीस आक्रमक झाले आहे.

पुणे पोलिसांची धडक कारवाई, गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतली ही मोठी ॲक्शन
Pune PoliceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2023 | 2:31 PM
Share

पुणे | 27 जुलै 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होत नाही. कोयता गँगचा उपद्रव सुरु आहे. व्यापाऱ्यावर हल्ला झाला. बलात्काराची घटनाही घडली. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी बंदोबस्त केला असला तरी गुन्हेगारी कमी होत नाही. यामुळे कसबा मतदार संघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. आता या प्रकरणी पुणे पोलीस आक्रमक झाले आहे. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

काय सुरु पोलिसांनी सुरु

शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. पोलिसांनी शहरातील ६ हजार ११६ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. त्यापैकी ६०२ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगाराची घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे.

शस्त्र बाळगणाऱ्यांची खैर नाही

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांची आता खैर नाही. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये २८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील बस स्थानके रेल्वे स्थानक हॉटेल लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी करून संशयित वाहन चालकांची चौकशी केली जात आहे. नाकाबंदीत 934 वाहन चालकांची तपासणी केली आहे. २१३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

आयुक्त रस्त्यावर

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार काही दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरले होते. पुणे शहरातील सर्व पोलीस चौक्यांमध्ये २४ तास पोलीस राहणार आहेत. कामात हलगर्जी करणाऱ्यांवर बडतर्फे आणि निलंबनाची कारवाई रितेश कुमार यांनी केली. या कारवाईनंतर पोलीस दलात चांगली खळबळ माजली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.