AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kishore Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणास धक्कादायक वळण, आरोपींनी चोरल्या मोटारसायकली

Pune Talegaon Kishore Aware Murder Case : पुणे शहरातील तळेगावात सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची काल भरदिवसा हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी वेग दिला आहे. या प्रकरणी काही महत्वाचे पुरावे मिळाले आहे.

Kishore Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणास धक्कादायक वळण, आरोपींनी चोरल्या मोटारसायकली
Kishore Aware
| Updated on: May 13, 2023 | 11:23 AM
Share

पुणे : पुणे शहरात भरदिवसा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्यांवर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला होता. आधी पिस्तूलने गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. या प्रकारानंतर पुणे शहरात खळबळ माजली आहे. हा हल्ला कोणी केली आणि त्याचे कारण काय? याचा तपास सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे नाव या घटनेत आले आहे. दरम्यान हल्ला केल्यानंतर आरोपींनी दोन मोटारसायकलींची चोरी केली आहे.

थेट आमदारावर आरोप

किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे.

मोटारसायकली चोरल्या

किशोर आवारे खून प्रकरणातील हल्लेखोरांनी खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी दोन मोटारसायकली चोरल्या. याप्रकरणी मोटारसायकलच्या ३८ वर्षीय मालकाने पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीने घटनास्थळावरून फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला. घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी आरोपींनी आणखी एक दुचाकी चोरली.

पैसे काढत असताना चोरली गाडी

फिर्यादी तळेगाव दाभाडे येथील बाजारात गेले होते. घटनेच्या वेळी ते एटीएममधून पैसे काढून बाहेर पडत होते. त्यावेळी पिस्तूलने आरोपींनी त्यांना धमकावले आणि त्याची दुचाकी घेऊन पळ काढला. आरोपींनी त्याच परिसरात मालकाला शस्त्राचा धाक दाखवून दुसरी दुचाकी चोरल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या चार मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. परंतु आरोपीला ताब्यात घेतल्याचा वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. पोलीस हल्लेखोरांच्या मोबाईलच संभाषण (सीडीआर) काढून तपास करतील. त्यात आ.शेळके यांचे नाव आले तर त्यांच्या अडचणी वाढणार आहे.

दीड महिन्यापूर्वी झाला होता खून

दीड महिन्यापूर्वी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाली होती. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही मावळात असे खून झाले आहेत. पुन्हा हे खूनसत्र सुरु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.