AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांच्या पाण्याचा वाद मिटता मिटेना ; पुणे महापालिकेच्या बेमाप पाणीवापरा विरुद्ध शेतकऱ्याची एमडब्ल्यूआरआरकडे याचिका; काय आहे प्रकरण?

प्राधिकरणाच्या आदेशाला खो देत महापालिका नमूद केल्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिका जजलसंपदा प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न करून अवमान करत असल्याचे निदर्शनास आणून देत जराड यांनी प्राधिकरणात पुन्हा अवमान याचिका दाखल केली आहे.

पुणेकरांच्या पाण्याचा वाद मिटता मिटेना ; पुणे महापालिकेच्या बेमाप पाणीवापरा विरुद्ध शेतकऱ्याची एमडब्ल्यूआरआरकडे याचिका; काय आहे प्रकरण?
pune khadakwasla dam
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 1:21 PM
Share

पुणे – पुणेकर नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत  मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद अद्यापही मिटलेला नाही. पुणे महानगरपालिका(PMC) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने(Maharashtra Water Resources Regulatory Authority) घालून दिलेले आदेश डावलून पाण्याचा अतिरिक्त वापर करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याबाबत पुन्हा एका शेतकऱ्याने(Farmer) प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या 4 फेब्रुवारी सुनावणी होणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

खडकवासला धरणातून पुणे महापालिका नियमापेक्षा पाणी वापरत असल्यावरून बारामती येथील शेतकरी विठ्ठल जराड यांनी महापालिकेच्या विरोधात प्राधिकरणाकडे 24 जानेवारी 2017 रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर याचिकेवर सहा सुनावण्या झाल्यानंतर 2  नोव्हेंबर 2017  रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी पुणे महापालिकेने लोकसंख्येनुसार पाणी वापर करावा आणि जलसंपत्ती प्राधिकरणाच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले होते. प्राधिकरणाने महापालिकेला विशिष्ट अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वापरण्याचे आदेश दिले होते. मात्र प्राधिकरणाच्या आदेशाला खो देत महापालिका नमूद केल्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिका जजलसंपदा प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न करून अवमान करत असल्याचे निदर्शनास आणून देत जराड यांनी प्राधिकरणात पुन्हा अवमान याचिका दाखल केली आहे. येत्या 4 फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार आहे. याबाबत प्राधिकरणाच्या वतीने महापालिका आणि जलसंपदा विभागाला कळवण्यात आले आहे.

बैठकीत पाणी कपात न करण्याचा निर्णय महापालिकेच्या आगामी काळातील निवडणुका लक्षात घेत, शहरात कुठल्या प्रकरचा पाणी कपात न करण्याचा निर्णय नुकत्याच झालेलया कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबरोबरच शहराला अतिरिक्त स्वरूपाचा पाणी पुरवठा करण्याबाबत मुळशी धरणातील पाणी उपलब्ध करण्याबाबत माजी सनदी अधिकारी अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मल्याळम अभिनेत्रीचं लैंगिक शोषण प्रकरण : ट्रायल पूर्ण करण्यासाठी केरळ सरकारने वेळ वाढवून मागितली, मात्र न्यायालयाचा नकार

Ranjitsinh Disale : मानसिक त्रास दिल्याचे,पैसे मागितल्याचे पुरावे द्या, सोलापूर जिल्हा परिषदेचे रणजितसिंह डिसले यांना पत्र

Somvati Amavasya 2021 | आयुष्यातून दारिद्र्य दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला हे उपाय नक्की करा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.