AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somvati Amavasya 2021 | आयुष्यातून दारिद्र्य दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला हे उपाय नक्की करा

हिंदू (Hindu)धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना विशेष असं महत्त्व आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीवर अमावस्या येते. यावेळी अमावस्या सोमवारी येत आहे. म्हणून त्याला ‘सोमवती अमावस्या’ (Somavati Amavasya) असे म्हणतात.

Somvati Amavasya 2021 | आयुष्यातून दारिद्र्य दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला हे उपाय नक्की करा
Sombvati-amavasya
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 1:37 PM
Share

मुंबई :  हिंदू (Hindu)धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना विशेष असं महत्त्व आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीवर अमावस्या येते. यावेळी अमावस्या सोमवारी येत आहे. म्हणून त्याला ‘सोमवती अमावस्या’ (Somavati Amavasya) असे म्हणतात. सोमवारचा दिवस भगवान शंकर यांना समर्पित असतो. या दिवशी शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर काही लोक सोमवारी उपवासही ठेवतात. (Somvati Amavasya 2022 Know The Importance And Shubh Muhurt Of Somvati Amavasya). या दिवशी भगवान शिवाची आराधना केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो. या दिवशी महिला आपल्या पती आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.

सोमवती अमावस्येला करा हे खास उपाय

पितरांची कृपा सोमवती अमावस्या ही पितरांसाठीही विशेष मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी गायींच्या अग्नीत गूळ-तुपाचा उदबत्ती लावून पितरांची प्रत्येक चुकांची क्षमा मागावी, याने त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो.

तुळशीची किंवा पिंपळाची पुजा सोमवती अमावस्येला अशी समजूत आहे की, स्नान केल्यानंतर ध्यान करून पूजा करताना तुळशीची किंवा पिंपळाची १०८ प्रदक्षिणा करावीत, असे केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दारिद्र्य दूर होते.

शिवलिंगाला दूध अर्पण करा ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही यांचा आशीर्वाद देतात. सोमवतीच्या दिवशी असे केल्याने जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि दारिद्र्य दूर होते.

गणपतीची पूजा करा या दिवशी भगवान शिवाची पूजा विशेष मानली जाते, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, या दिवशी पूर्ण भक्तीभावाने गणेशाला सुपारी अर्पण केल्यास आणि रात्री गणेश मूर्तीसमोर दिवा ठेवल्यास शाश्वत फळ प्राप्त होते.

विहिरीत टाका एक नाणे जीवनात पैशाची कमतरता असल्यास सोमवती अमावस्येच्या रात्री विहिरीत एक चमचा दूध आणि एक रुपयाचे नाणे टाकल्याने जीवनातील संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते.

दान आणि स्नान करणे सुनिश्चित करा सोमवती अमावस्या शाश्वत फळ देणारी आहे असे म्हणतात. अशा स्थितीत या दिवशी दान करण्याचे आणि गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे.

सोमवती अमावस्येचे महत्त्व सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. याशिवाय पितरांना तर्पणदेखील दिले जाते. यामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. मान्यता आहे की, जर कुणाच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी विधीवत पूजा केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते. याशिवाय, सोमवार असल्याने महादेवाची पूजा अवश्य करावी.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Somavati Amavasya 2022 | सोमवती अमावस्येची आख्यायिका काय? जाणून घ्या पूजेची पद्धत

Debt Relief | आज चुकूनही कर्ज घेऊ नका, नाहीतर तुमच्यावर संक्रांत आलीच म्हणून समजा

Vastu Tips | तणाव दूर करणारा पारिजात, जाणून घ्या ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांची कमाल

प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान.