AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी

कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही

Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 5:45 PM
Share

पुणे : सध्या देशभरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंग्यावरुन वाद सुरु आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या आपल्या बीकेसीच्या सभेत तोफ डागली होती. त्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे वाटत नाही. तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेती पिकाला भाव मिळत नाही, पाण्यासाठी वणवन फिरावं लागतं हे महत्वाचं आहे. तर मराठवाड्यात उभा ऊस आहे तसाच आहे. उसाला तोड मिळत नाही म्हणून शेतकरीआत्महत्या करत आहे. परंतु सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारला (Mahavikas Aghadi government) टोला लगावला आहे.

दुर्दैवाची बाब

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पुण्यात आले असता बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायाला सरकारला वेळ नाही मात्र सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या ज्या आघाड्या आता देशात आहेत त्यांनी सर्वात पहिलं आम्ही जणसामान्यांसाठी आहोत ही भावना ठेवावी. त्यांचे प्रश्न सोडविल्या शिवाय हटणार नाही असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण करावा. त्यांना तसे करावेच लागेल. परंतु कोणत्याही आघाडीने असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण केला नाही. मात्र तो विश्वास निर्माण केला तर जनता नक्कीच त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्र्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

केतकीचा समाचार

तसेच त्यांनी यावेळी अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या शरद पवार यांच्या टीकेला उत्तर ही दिलं. ते म्हणाले, कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.