AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी

कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही

Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीImage Credit source: tv9
| Edited By: aslam shanedivan | Updated on: May 16, 2022 | 5:45 PM
Share

पुणे : सध्या देशभरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंग्यावरुन वाद सुरु आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या आपल्या बीकेसीच्या सभेत तोफ डागली होती. त्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे वाटत नाही. तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेती पिकाला भाव मिळत नाही, पाण्यासाठी वणवन फिरावं लागतं हे महत्वाचं आहे. तर मराठवाड्यात उभा ऊस आहे तसाच आहे. उसाला तोड मिळत नाही म्हणून शेतकरीआत्महत्या करत आहे. परंतु सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारला (Mahavikas Aghadi government) टोला लगावला आहे.

दुर्दैवाची बाब

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पुण्यात आले असता बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायाला सरकारला वेळ नाही मात्र सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या ज्या आघाड्या आता देशात आहेत त्यांनी सर्वात पहिलं आम्ही जणसामान्यांसाठी आहोत ही भावना ठेवावी. त्यांचे प्रश्न सोडविल्या शिवाय हटणार नाही असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण करावा. त्यांना तसे करावेच लागेल. परंतु कोणत्याही आघाडीने असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण केला नाही. मात्र तो विश्वास निर्माण केला तर जनता नक्कीच त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्र्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

केतकीचा समाचार

तसेच त्यांनी यावेळी अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या शरद पवार यांच्या टीकेला उत्तर ही दिलं. ते म्हणाले, कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार