Sharad Pawar: कर्तृत्वान लोकप्रतिनिधी गेला… शरद पवारांचा तो सर्वात मोठा सल्ला, काँग्रेस मनावर घेणार?
Sharad Pawar on Baramati Byelection-Congress: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्याआड मोठे राजकीय डावपेच सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे. काँग्रेस हा सल्ला मनावर घेणार का?

Sharad Pawar on Baramati Byelection-Congress: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षावर दबाव वाढला आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दोनदा फोन करून दिलेला उमेदवार मागे घेण्याची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊतांनीहीय प्रकरणी वक्तव्य केले आहे. त्याचवेळी रोहित पवार यांनी सकाळी सपकाळांची भेट घेतली. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. तर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघे काही तास
बारामती पोटनिवडणूक ही आता प्रतिष्ठेची ठरली आहे. बड्या नेत्याच्या निधनानंतर त्या ठिकाणी शक्यतो इतर पक्ष उमेदवारी न देण्याची भूमिका घेतात. राज्यात यापूर्वीही अशी राजकीय संस्कृती जपण्यात आली आहे. अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला नाही तर उद्धव सेना सुद्धा निवडणूक देण्यास इच्छुक दिसली नाही. पण काँग्रेसने येथे आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत 53 उमेदवार निवडणुकीच रिंगणात आहेत. यातील अनेक उमेदवार हे मतदारसंघा बाहेरील असल्याचे समजते. तर काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी सर्वांनीच गळ घातली आहे. आज सकाळपासून त्यासाठी बड्या घडामोडी घडल्या आहेत. थोड्याच वेळात काँग्रेस भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार यांचा सल्ला ऐकणार?
आज सकाळीच रोहित पवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला पोहचले. त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. तर काँग्रेसचे उमेदवार अशोक मोरे यांनी सकाळीच शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसवर दबाव वाढल्याचे दिसते. काँग्रेसचे पक्ष श्रेष्ठी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेसला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला दिला आहे. काँगेसचे लढायचं ठरवले आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा रिक्त झाली अपघाताने झाली. कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल. ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.