AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : …तर मदतीसाठी पुढे येणारे केंद्रातले एकच मंत्री ते म्हणजे नितीन गडकरी! पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवारांकडून कौतुक

यावर्षी सारखेचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार 90 लाख टनापेक्षा जास्त साखरेची निर्यात झाली आहे. या हंगामात 64 लाख टन साखर निर्यातीसाठी करार झालेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

Sharad Pawar : ...तर मदतीसाठी पुढे येणारे केंद्रातले एकच मंत्री ते म्हणजे नितीन गडकरी! पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवारांकडून कौतुक
शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात फोनवरून चर्चाImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jun 04, 2022 | 1:47 PM
Share

पुणे : केंद्र सरकारमध्ये ऊसाचा, साखरेचा किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर मदतीसाठी नेहमी पुढे येणारे एकच मंत्री आहेत, ते म्हणजे नितीन गडकरी (Nitin Gadkari), असे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचे केले आहे. ते पुण्यात बोलत होते. मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथील राज्यस्तरीय साखर परिषदेत त्यांनी गडकरींचे कौतुक केले आहे. गेल्या वर्षापर्यंत या देशात साखरेचे उत्पादन (Sugar production) घेणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश होते. मात्र यावर्षी महाराष्ट्र साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आला आहे. गाळपाचा अतिरिक्त भार कारखान्यांवर वाढला आहे. ऊसाचे उत्पादन आणखी वाढणार आहे. पावसाची परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता असल्याने ऊसाचे उत्पादन वाढणार असल्याची शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

‘ऊसतोडीचे नियोजन आताच करावे’

ऊसतोडीचे नियोजन आताच करावे लागेल. साखरेची निर्यात चांगली झाली आहे. यावर्षी सारखेचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार 90 लाख टनापेक्षा जास्त साखरेची निर्यात झाली आहे. या हंगामात 64 लाख टन साखर निर्यातीसाठी करार झालेत, अशी माहिती त्यांनी दिली. भारताने यावर्षी जगातील 121 देशात साखरेची निर्यात केली, हे पहिल्यांदा झाले, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

नितीन गडकरींचे कौतुक करताना काय म्हणाले शरद पवार?

‘…तर उत्पादनात भरीव वाढ’

आज आपल्या शेतकऱ्यांकडे दोन पैसे मिळतील, असे खात्रीशीर पीक नाही.अपेक्षित ऊस उत्पादन यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊस विकास योजना सातत्याने राबविली जात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम ऊस उत्पादनावावर होत आहे. ऊस विकास योजना राबवली तर उत्पादनात भरीव वाढ होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, विजेची मागणी वाढत आहे. मात्र कोळश्याची निर्मिती कमी झाली आहे. विजेची मागणी वाढली आहे. 6 हजार मेगावॅट विजेची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे बाहेरून विजेची खरेदी करावी लागत आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...