Pune missing: धक्कादायक, पुण्यातून का गायब होतायेत महिला? 7 महिन्यांत 840 महिला बेपत्ता, काय आहेत कारणं?

पिंपरी चिंचवड पोलीस कमिश्नरांच्या हद्दीतून 885 महिला बेपत्ता झाल्यात. तर पुणे ग्रामीण पोलिसांच्या नोंदीनुसार हा आकडा 743 आहे. या महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या कारमांमुळे या महिला बेपत्ता होत असल्याची माहिती आहे. घरातील भांडणे, पटत नसणे, प्रेम प्रकरणे, अवैध संबंध, अपहरण, मानवी तस्करी अशी काही कारणे यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच स्वतंत्र जीवनशैली हेही यामागचे एक कारण असल्याचे सांगण्यात येते आहे.  

Pune missing: धक्कादायक, पुण्यातून का गायब होतायेत महिला? 7 महिन्यांत 840 महिला बेपत्ता, काय आहेत कारणं?
का बेपत्ता होतायेत महिला?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:01 PM

पुणे – पुणे जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून महिला बेपत्ता (women disappear)होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. गेल्या सात महिन्यांत पुणे जिल्ह्यातून (Pune district) 840 महिला गायब झाल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी 2022 सालातील गेल्या सात महिन्यांतील दिलेल्या आकडेवारीत 840  महिला बेपत्ता झाल्याची प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यातल्या 396 महिलांचा आत्तापर्यंत तपास लागलेला नाही. जून महिन्यात सर्वाधिक 186 महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर मे महिन्यात 135  महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad)पोलीस कमिश्नरांच्या हद्दीतून 885 महिला बेपत्ता झाल्यात. तर पुणे ग्रामीण पोलिसांच्या नोंदीनुसार हा आकडा 743 आहे. या महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या कारमांमुळे या महिला बेपत्ता होत असल्याची माहिती आहे. घरातील भांडणे, पटत नसणे, प्रेम प्रकरणे, अवैध संबंध, अपहरण, मानवी तस्करी अशी काही कारणे यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच स्वतंत्र जीवनशैली हेही यामागचे एक कारण असल्याचे सांगण्यात येते आहे.

का गायब होतायेत महिला?

घरातून महिला अचानक बेपत्ता होण्याच्या प्रकरणात वाढ झाल्याने पोलिसांपुढेही चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. या बेपत्ता महिलांतील अनेक महिलांनी कौटुंबीक कलह किंवा नोकरी शोधण्यासाठी घर सोडल्याची माहिती आहे. यातल्या अनेक महिलांना नंतर त्यांची चूक उमगल्यानंतर त्या घरीही परतल्याची माहिती आहे. या सगळ्यात जास्त मुली या सरासरी 16 ते 25 च्या वयोगटातील आहे. घरात सातत्याने होत असलेल्या भांडणांमुळे त्यातील अनेकींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

मानवी तस्करीचाही संशय

गायब होणाऱ्या महिला या मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर या सगळ्या प्रकरणांची पाळेमुळे ही मानवी तस्करीशी संबंधित असू शकतात, असा सामाजिक कार्यकर्ते आणि एनजीओंना संशय आहे. या सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि एनजीओ याच विषयावर काम करीत आहेत. तर पोलिसांच्या माहितीनुसार, या महिला अनेकदा कारणांमुळे घर सोडत असल्याची माहिती आहे. या महिलांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

स्वतंत्र जीवन जगण्याची महिलांची इच्छा

ज्या महिला आता घरी परतल्या आहेत, त्यांच्यामुसार त्या स्वतंत्र जीवन जगू इच्छित होत्या, म्हणून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. असे पोलिसांना त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. अनेक महिलांना घरातील रुढी, परंपरा मान्य नसल्याने, त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचेही सांगण्यात येते आहे. तर अनेक प्रकरणांत महिलांचे अपहरणही झाले असल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.