AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhas Kande : …तर निवडणूक आयोगाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मत बाद केल्यानंतर शिवसेनेचे सुहास कांदे आक्रमक

माझे म्हणणे ऐकून न घेता हा निर्णय झाला आहे. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. कोर्टालादेखील कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासण्याची विनंती केली आहे. भाजपाच्या विरोधात नसून निवडणूक आयोगाने अन्याय केला आहे. त्याविरोधात हा निर्णय घेतला असल्याचे सुहास कांदे म्हणाले.

Suhas Kande : ...तर निवडणूक आयोगाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मत बाद केल्यानंतर शिवसेनेचे सुहास कांदे आक्रमक
सुहास कांदेImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jun 12, 2022 | 3:30 PM
Share

पुणे : मी असे काहीही केले नाही, ज्यामुळे राज्यसभा निवडणुकीतील माझे मत अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे याविरोधात याचिका दाखल करणार, असे शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. अनिल अंतुरकर यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. निवडणूक आयोगाच्या (Election commission) विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. जर निकाल माझ्या बाजूने लागला तर निवडणूक आयोगाच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. माझे मत जर कोर्टाने गृहीत धरले तर निवडणूक नियमबाह्य होते. संजय राऊत (Sanjay Raut) निवडून आले आणि एक मत धरले नाही तर निवडणूकच रद्द होते, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, आज सुट्टी असल्याने उद्या याचिका दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आक्षेप चुकीचा’

माझी मतपत्रिका दुसऱ्याला दिसेल अशी ठेवली हा आक्षेप अत्यंत चुकीचा आहे. त्यानंतर प्रतोद सोडून इतरांना ती दाखवली, हेही चुकीचे आहे. त्यांना आक्षेप होता तर मतपत्रिका मतपेटीत जाण्याआधी आक्षेप घ्यायला हवा होता. केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे जायचे असेल तर आमदार योगेश सागरांनाच करायला हवे होते. मुख्तार अब्बास नक्वी यांनी ते केले. त्यांना मुळात अधिकारच नाही. त्यांनी आधी मला नोटीस पाठवायला हवी होती. घटनेनुसार माझे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. हे सर्व हुकूमशाही पद्धतीने झाले आहे. त्याविरोधात मी याचिका दाखल करत आहे, असे कांदे म्हणाले.

काय म्हणाले सुहास कांदे?

‘माझे म्हणणे ऐकून न घेता निर्णय’

माझे म्हणणे ऐकून न घेता हा निर्णय झाला आहे. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. कोर्टालादेखील कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासण्याची विनंती केली आहे. भाजपाच्या विरोधात नसून निवडणूक आयोगाने अन्याय केला आहे. त्याविरोधात हा निर्णय घेतला असल्याचे सुहास कांदे म्हणाले. तसेच ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला त्यांनीच केंद्रीय आयोगाकडे तक्रार करायला हवी होती. मात्र मुक्तार अब्बास नक्वींनी तक्रार केली, यावर माझा आक्षेप असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनाही मी हे सर्व सांगितले. मुख्यमंत्रीही म्हणाले हा अन्याय आहे, अशी माहिती कांदे यांनी दिली.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...