AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Dams : सावधान! मुळशी, पानशेत धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा अनियंत्रित विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 9.30 वाजता 12 हजार 936 क्युसेक करण्यात आला.

Pune Dams : सावधान! मुळशी, पानशेत धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा अनियंत्रित विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुळशी धरण (संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Aug 11, 2022 | 10:42 AM
Share

पुणे : मुळशी धरणाची (Mulshi dam) जलाशय पातळी 605.70 मिटरवर पोहोचली आहे. तर संबंधित जलाशय साठा 506.52 द.ल.घ.मी. आहे. आज सकाळी सात वाजताची ही पातळी असल्याचे टाटा पॉवरकडून (Tata Power) सांगण्यात आले आहे. धरण जलाशय 88.74 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्ज्यन्यवृष्टी होत असून गेल्या 24 तासांत दावडी पर्ज्यन्यमापक केंद्रात 304 मीमी पावसाची नोंद झालेली आहे तसेच गेल्या 24 तासांत एकूण 49.49 द.ल.घ.मी आवकाची नोंद झालेली आहे. येत्या काही दिवसांचा भारतीय हवामान खात्याचा (IMD) अंदाज, सद्यस्थितीतील पर्ज्यन्याचा कल पाहता पुढील काही काळात आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा नियंत्रित विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, असे टाटा पॉवरचे प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले आहे.

पाणीपातळीत झपाट्याने वाढ

खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. या पाणीपातळीत होत असलेली वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे दुपारी बारादरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 1712 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या रहिवाशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पानशेतही भरले

पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 10.15 पर्यंत 18 हजार 784 क्युसेक करण्यात आला. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाऊस सुरूच

पुणे आणि परिसराला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा कालच हवामान विभागाने दिला होता. त्यासोबतच विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे जलसाठ्यातही मोठी वाढ झाली. चारही धरणात एकूण 21.54 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत 73.90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर सततच्या पावसामुळे या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ