AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामगारांना घेऊन कंपनीत चालली होती बस, पण पुलावर बसचा टायर फुटला अन्…

जेएसडब्लू कंपनीची बस नेहमीप्रमाणे पनवेल ते वडखळ अशी कामगारांना घेऊन कंपनीकडे चालली होती. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरुन येत असताना अचानक बसचा टायर फुटला.

कामगारांना घेऊन कंपनीत चालली होती बस, पण पुलावर बसचा टायर फुटला अन्...
रायगडमध्ये बस अपघातात सहा जखमीImage Credit source: TV9
| Updated on: May 03, 2023 | 6:24 PM
Share

रवी खरात, पेण : पेण तालुक्यातील वडखळ डोलवी हद्दीत जे एस डब्ल्यू कंपनीची कामगारांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्याची घटना घडली. उचेड नजीक ब्रिजवर टायर फुटून बस पलटी होऊन अपघात झाला. बसमध्ये 17 ते 18 कामगार प्रवास करत होते. यात सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपाचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील लेनवर काही काळ वाहतूक खोळंबली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

बसचा टायर फुटल्याने अपघात

पेणवरुन जेएसडब्ल्यू कंपनीची बस कामगारांना घेऊन कंपनीत चालली होती. उचेड नजीक ब्रिजवर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास टायर अचानक फुटून बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. या बसमध्ये 17 ते 20 कामगार प्रवास करत होते. सात ते आठ कामगार प्रवासी सध्या जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.

वडखळ पोलिसात अपघाताची नोंद

इंद्रजित शंकरचंद्र सहा, प्राजक्ता श्रीराम मोडक, दिशाली विवेक पाटील, राहुल सदाशिव पाटील, चालक सुमित सुभाष जुईकर, देवेंद्र जगदिश भोईर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश रुईकर अधिक तपास करीत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.