AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात, राज्याच्या या भागालाही पावसाने झोडपलं, नागरिकांची तारांबळ

Rain Arrives in Mumbai : राज्यातील अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. राजधानी मुंबई आणि उपनगरातही पावसाचे आगमन झाले आहे. घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात, राज्याच्या या भागालाही पावसाने झोडपलं, नागरिकांची तारांबळ
Rain Starts in MumbaiImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 09, 2026 | 7:19 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. राजधानी मुंबई आणि उपनगरातही पावसाचे आगमन झाले आहे. घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. रस्ते ओले चिंब झाले असून वाहने धीम्या गतीने धावत आहेत. या पावसामुळे उकाड्या पासून हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदरडी परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे शेतकरी लक्ष्मण पगार यांच्या 2 एकरातील डाळिंब बागेला फटका बसला. ऊन आणि पावसापासून बचावासाठी त्यांनी बागेला नेट अंथरली होती. मात्र वादळी वाऱ्याने तिचे नुकसान झाले, तसेच फळांनी लगडलेली झाडे उन्मळून पडली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

माणगावमध्ये पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या तीव्रतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. उन्हाच्या कडक झळांपासून त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले. या पावसामुळे शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेती कामांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

नांदेडच्या किनवटमध्ये तुफान पाऊस

नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ परिसरात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेत काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसामुळे गोंड जेवली नाक्याजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. आता पुलाची उंची वाढवून नव्याने पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नांदेड – शिबदरा येथे वीज पडून 4 वानरांचा मृत्यू,

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शिबदरा येथे वीज कोसळून चार वानरांचा मृत्यू झाला. शिबदरा येथे विजेच्या कडकडासह वादळी वारा आणि चांगलाच पाऊस झाला. या पावसावेळी गावामध्ये एका ठिकाणी वानराचा कळप होता. या कळपावर वीज पडल्याने चार वानराचा जागीच मृत्यू झाला आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...