AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेची तिसरी यादी जाहीर, ‘त्या’ नावाने सर्वांच्या भुवया उंचावल्या; 13 उमेदवारांमध्ये कोण कोण?

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. याआधी मनसेकडून काल रात्री उशिरा 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज 13 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

मनसेची तिसरी यादी जाहीर, 'त्या' नावाने सर्वांच्या भुवया उंचावल्या; 13 उमेदवारांमध्ये कोण कोण?
महायुती आणि महाविकास आघाडीसह यावेळी वंचित सोबतच महाशक्ती परिवर्तन ही तिसरी आघाडी सुद्धा मैदानात आहे. जरांगेंचेही उमेदवार मैदानात असतील आणि या लढाईत भाजपचे 50 आमदारही निवडून येणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
| Updated on: Oct 23, 2024 | 8:39 PM
Share

मनसेकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिकमधील भाजप नेत्याचं नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण हा नेता नाशिकमधील भाजपचा बडा नेता आहे. या नेत्याला नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवायची इच्छा आहे. त्यामुळे या नेत्याने भाजप पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. याउलट नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज असलेल्या दिनकर पाटील यांनी बंडाची भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तडकाफडकी आज मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. मनसेकडून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिनकर पाटील यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. दिनकप पाटील काही माजी नगरसेवकांसह मनसेत दाखल झाले आहेत. त्यांच्या या पुढच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. या निवडणुकीत ते सीमा हिरे यांचा पराभव करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ” भाजप पक्षाने माझ्यावर वारंवार अन्याय केला. महापौर बनवण्याचे सांगितले, विधानसभेला देखील थांबायला लावले. लोकसभेलाही थांबायला लागले. पुन्हा एकदा विधानसभेला आता थांबायला लावले. आता निवडणूक लढवणार. कुठल्या पक्षाकडून लढवणार की अपक्ष लढवणार हे कार्यकर्त्यांशी बोलून सांगणार”, अशी प्रतिक्रिया दिनकर पाटील यांनी याआधी दिली होती. दिनकर पाटील यांनी त्यानंतर निर्धार मेळावा घेतला होता. निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून दिनकर पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन मी थांबलो. पण आता विधानसभेला थांबणार नाही, असंही ते म्हणाले. यानंतर त्यांचा मनसेत प्रवेश झाला.

मनसेकडून तिसऱ्या यादीत 13 उमेदवारांची घोषणा

दिनकर पाटील यांनी आज मनसे पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का दिला आहे. मनसेने याआधी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता 13 उमेदवारांची तिसरी यादी मनसेकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अमरावतीतून पप्पू उर्फ मंगेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अहमदपूर-चाकूर मतदारसंघातून नरसिंग भिकाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पाहा सर्व 13 उमेदवारांची तिसरी यादी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.