AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर, आंबेडकरी नेत्यांमधील वाद कायम; आठवले म्हणाले…

आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. आता ऐक्य शक्य नाही. (Ramdas Athawale Prakash Ambedkar)

ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर, आंबेडकरी नेत्यांमधील वाद कायम;  आठवले म्हणाले...
| Updated on: Dec 29, 2020 | 9:35 AM
Share

अहमदनगर : “मी म्हणालो होतो की रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य होणार असेल तर मी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मात्र, आता आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. आता ऐक्य शक्य नाही,” असे मोठे विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. ते अहमदनगर येथे बोलत होते. तसेच, मी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांना एनडीएमध्ये या असं म्हणालो होतो. मात्र, एनडीएमध्ये त्यांची आवश्यकता नाही अशी खोचक टिप्पणी करत त्यांच्या मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजाला फायदा होणार नसल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. (Ramdas Athawale criticized Prakash Ambedkar on VBA and his politics)

आता ऐक्य शक्य नाही?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात लढण्यास तयार असल्याचे यापूर्वी अनेकदा सांगितलेले आहे. आंबेडकर नेतृत्व स्वीकारत असतील तर हरकत नसल्याचेही ते यापूर्वी म्हणाले होते. मात्र, आता रामदास आठवले यांनी आपला पवित्रा बदलला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली असून त्यांचा रिपब्लिकन पक्षाशी संबंध राहीला नसल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. “रिपब्लिकन पक्षात ऐक्य होत असेल तर मी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करेल असे मी म्हणालो होतो. मात्र आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी संबंध राहिला नाही कारण त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. आता ऐक्य शक्य नाही” असे आठवले म्हणाले.

आंबेडकरांनी मतं मिळवली पण

आठवलेंनी यावेळी प्रकाश आंबेडकरांशी ऐक्य होणे शक्य नसल्याचे यावेळी सांगितले. तसेच, प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजाला फायदा होणार नसल्याचे म्हणत त्यांनी आंबेडकरांवर टीका केली आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतःच्या बळावर चांगली मतं घेतली. मात्र त्यांचा एकही खासदार किंवा आमदार निवडून आला नाही. त्यांच्या मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजला फायदा होणार नाही,” अशी टीका आठवलेंनी केली. तसेच, आंबेडकरांनी कोणत्या तरी पक्षासोबत जाण गरजेचं असल्याचा सल्लाही त्यांनी आंबेडकरांना दिला.

संबंधित बातम्या :

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…!’, आठवलेंनी कविता करत उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

नारायण राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही, भाजपचं सरकार आलं नाही म्हणून तडफड : एकनाथ गायकवाड

विधान परिषद : ठाकरे सरकारकडून विचारणा, राज्यपालांकडून प्रतिसाद नाही

(Ramdas Athawale criticized Prakash Ambedkar over VBA and his politics)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.