AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस ठेवली.., रामदास कदम आपल्या दाव्यावर ठाम, आता घेतला मोठा निर्णय, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

रामदास कदम यांनी गंभीर आरोप केला आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असा दावा त्यांनी केला आहे, त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस ठेवली.., रामदास कदम आपल्या दाव्यावर ठाम, आता घेतला मोठा निर्णय, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 2:53 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा दावा केला होता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा दावा त्यांनी केला होता. दरम्यान कदम यांच्या या दाव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. कदम यांच्या दाव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, मी गद्दार आणि  नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यानंतर आता कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अज्ञानाचं प्रदर्शन केलं आहे. मी जे दसरा मेळाव्यात बोललो, त्यात मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता. ते उपचार करत होते. ते त्यांचं म्हणणं आहे. अनिल परब पैशांसाठी त्या डॉक्टरांवर दावा टाकणार आहेत का? असा सवाल यावेळी कदम यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी आज निर्णय घेतला आहे. या प्रकरणावर शासनाने सीबीआय चौकशी करावी. याचं पत्र मी सीएमला सोमवारी देणार आहे. दोन दिवस बॉडी का ठेवली? याची चौकशी करावी. म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

कदम यांनी नेमका काय केला होता दावा? 

शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना कदम यांनी मोठा दावा केला होता, बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असं त्यांनी म्हटलं होतं, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.