AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामनवमी यात्रेत रहाट पाळणा तुटला आणि अनर्थ घडला…; गर्दीतच कोसळला पाळणा 4 जण झाले गंभीर…

अपघातातील रूग्णांवर पुर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून यामध्ये आणखी कुणी जखमी आहे का त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रामनवमी यात्रेत रहाट पाळणा तुटला आणि अनर्थ घडला...; गर्दीतच कोसळला पाळणा 4 जण झाले गंभीर...
| Edited By: | Updated on: Apr 01, 2023 | 11:07 PM
Share

शिर्डी : श्रीरामनवमी यात्रेतील रहाट पाळणा तुटून झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील जागेत हे पाळणे लावण्यात आलेले आहेत.यामधील एक खालीवर होणाऱ्या ट्रॉलीचा पाळणा अचानक तुटला. यामुळे पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले तर काहीजण पाळण्यात बसण्यासाठी बाजुला उभे होते त्यांच्यावर हे पाळणे आदळल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटने ज्योती किशोर साळवे (वय-45), किशोर पोपट साळवे, (वय-50) यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

याशिवाय भूमी अंबादास साळवे, (वय-14) हिच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. तसेच प्रवीण अल्हाट, (वय-45) हा तरुणही गंभीर जखमी झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातातील जखमींना तातडीने संस्थानाच्या साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचाराला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक व उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी सांगितले.

अपघातातील रूग्णांवर पुर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून यामध्ये आणखी कुणी जखमी आहे का त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. डॉ. खुराणा, डॉ. प्रशांत गोंदकर, डॉ. राजु तलवार, डॉ. समीर पारखे यांनी तातडीने रूग्णांवर उपचार सुरू केले.

शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी व नंतर रूग्णालयात धाव घेतली आहे. या घटनेमुळे रामनवमी उत्सवाला गालबोट लागले असुन साळवे दाम्पत्य अत्यंत गरीब असुन त्यांच्या पायांना गंभीर इजा झाली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.