AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, मी अजितदादांनाही… सूरदास यांचा खळबळजनक दावा

मोठी बातमी समोर येत आहे, इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी मोठा दावा केला आहे. श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल देखील मोठा दावा केला आहे.

श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, मी अजितदादांनाही... सूरदास यांचा खळबळजनक दावा
सूरदास यांचा मोठा दावा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 20, 2026 | 10:29 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे,  श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केला आहे. अजित पवार यांना देखील मी हा ग्रंथ दिला होता, परंतु त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना होती, असं सूरदास यांनी म्हटलं आहे. सूरदास यांच्या या नव्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले सूरदास ? 

अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला होता, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर अजित पवार यांचं विमान उतरत असतानाच विमान थेट जमिनीवर कोसळलं, या घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातानंतर आता इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी मोठा दावा केला आहे.  श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत,  असं सूरदास यांनी म्हटलं आहे. तसेच मी हा ग्रंथ अजित पवार यांना भेट दिला होता, आषाढी एकादशीच्या दिवशी मी हा ग्रंथ अजित पवार यांना आपण भेट दिला होता, हा ग्रंथ त्यांनी आवश्य वाचावा असं देखील मी त्यांना म्हटलो होतो. परंतु  त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल, अजित पवार यांच्यासोबत जी काही घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे, असं यावेळी सूरदास यांनी म्हटलं आहे. दरम्यान सूरदास यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता, निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीला जात होते. विमान बारामती विमानतळावर उतरत असतानाच पायलटने नियंत्रण गमावलं आणि विमान जमिनीवर कोसळलं, या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आता सूरदास यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. श्रीमद् भागवतामुळे अपघाती मृत्यू टळतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?