AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित आर्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सर्वात मोठा खुलासा

रोहित आर्यच्या मृत्यूचे कारण अखेर स्पष्ट झाले आहे. जे. जे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसार, गोळी लागल्यानेच त्याचा मृत्यू झाला. गोळी छातीतून पाठीमागे बाहेर पडल्याने वाचण्याची शक्यता नव्हती. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आर्य जखमी झाला होता.

रोहित आर्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सर्वात मोठा खुलासा
rohit arya
| Updated on: Nov 04, 2025 | 8:15 AM
Share

पवई येथील आर. ए. स्टुडिओमध्ये १७ लहान मुलांना ओलीस ठेवून संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या रोहित आर्यच्या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. रोहित आर्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याच्या मृत्यूचे कारण नेमकं काय होतं, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. जे. जे. रुग्णालयात झालेल्या त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे की, रोहित आर्यचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला. या गोळीचे स्वरूप पाहता त्यांच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असे यात नमूद करण्यात आले आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

रोहित आर्य यांच्या मृतदेहावर शुक्रवारी उशिरा जे. जे. रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. या अहवालातील निष्कर्षानुसार, रोहित आर्य यांच्या छातीत गोळी लागली. ती त्यांच्या पाठीतून थेट बाहेर पडली. गोळी शरीराच्या एका भागातून घुसून दुसऱ्या भागातून बाहेर पडली. यामुळे त्यांच्या वाचण्याची शक्यता नव्हती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओलीस सोडवण्याच्या ऑपरेशनदरम्यान रोहित आर्य यांनी पोलिसांवर एअर गनने गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ज्यात आर्य जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पोस्टमॉर्टमनंतर रोहित आर्य यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शनिवारी पहाटे पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आर्य यांची पत्नी, मुलगा आणि काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

२ कोटी रुपयांची थकबाकी

दरम्यान रोहित आर्य यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडे स्वच्छता मॉनिटर या संकल्पनेसाठी सुमारे २ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा केला होता. या थकीत बिलासाठीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे एका व्हिडीओमध्ये म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, मंत्री दादा भुसे यांनी रोहित आर्य यांच्या कंपनीचे शिक्षण विभागाशी असलेले सर्व व्यवहार आणि कामांचा अहवाल मागवला आहे. तसेच, पोलिसांच्या कारवाईत आर्य यांचा मृत्यू झाल्यामुळे, नियमानुसार न्यायिक दंडाधिकारी चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…