AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात, मोदींनी माफी मागितली तरी…; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत

Sanjay Shirsat on Mahavikas Aghadi : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर मविआने घेतलेल्या भूमिकेवर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात, मोदींनी माफी मागितली तरी...; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत
महाविकास आघाडीImage Credit source: ANI
| Updated on: Aug 31, 2024 | 1:16 PM
Share

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र उद्घाटनानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यानंतर सिंधुदुर्गात जे झालं. आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. तर आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्य दैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली. पण ही राजकीय माफी असल्याची टीका विरोधक करत आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात”

शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करण्यासाची मविआ उद्या मोर्चा काढणार आहे. मात्र अद्याप या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. यावर शिरसाटांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडी कोणताही विषय गांभीर्याने घेत नाही. त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत. जाती- जातीमध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत आणि हे सगळं महायुतीमुळे घडतंय असं चित्र त्यांना निर्माण करायचा आहे. याची गुप्तवार्ता पोलिसांना पोहोचली असावी, म्हणून पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी दिली नसावी. तरी परवानगी घेऊन मोर्चा काढला आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही. चोख उत्तर त्यांना दिलं जाईल, असं संजय शिरसाट म्हणाले.

मोदींचा माफीनामा राजकीय नव्हे- शिरसाट

नरेंद्र मोदी यांनी कालच माफी मागितली आहे. यामध्ये कुठेही नाटकीपणा नव्हता. महापुरुषांची माफी मागताना लाज वाटण्याचं काही कारण नाही. सर्व महापुरुषांचा आदर आपण केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली. फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर हे देखील महापुरुष आहेत. त्यामुळे सावरकरांबद्दल मोदी सभेत बोलले. काँग्रेसला त्यांच्या मताचं राजकारण करायचं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे काम हे आग लावण्याचं काम करत आहेत, असं शिरसाट म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढं राजकारण करायची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांनी माफी मागितली आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान यांनी देखील माफी मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून यावरच राजकारण थांबलं पाहिजे. नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक पाहून माफी मागितली नाही. याचा राजकारणाशी जोड लावू नये. जर तसं होत असेल तर हे महामूर्खपणाचं लक्षण आहे, असंही शिरसाट म्हणालेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.