AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जे आज जोडे मारो आंदोलन करत आहेत, त्यांनाच काही दिवसांनी लोकं जोडे मारतील”; ठाकरे गटाच्या नेत्याने शिवसेनेला इशारा दिला

गद्दारीबाबत बोलतानाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, यांनी गद्दारी केली होती. मात्र ज्या शिवाजी महाराज यांना आम्ही आदर्श मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी गद्दारी आवडत नव्हती.

जे आज जोडे मारो आंदोलन करत आहेत, त्यांनाच  काही दिवसांनी लोकं जोडे मारतील; ठाकरे गटाच्या नेत्याने शिवसेनेला इशारा दिला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 03, 2023 | 5:05 PM
Share

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रमाणे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे, त्याच प्रमाणे आता छोट्या मोठ्या गोष्टीवरून महाविकास आघाडीमध्येही कुरघोड्या वाढल्या आहेत. त्यामुळेच आता मविआमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबरच विरोधकांसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षावरही खोचक टीका केली आहे.

त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देत असताना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी जे व्यक्तव्य त्याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

त्यामुळे त्यावरून आता आणखी काही वाद वाढवण्यात काही अर्थ नाही. तसेच खासदार संजय राऊत त्यांच्या जिभेला प्रॉब्लेम झाला होता असंही त्यांनी सांगितले.

तसेच त्यांच्या बोलण्यामुळेच संजय राऊत यांच्या विरोधात पहिल्यापासूनच इतर लोकं आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत काही वाईट बोलले नाहीत परंतु लोकांनी त्याचा गैर अर्थ काढला आहे त्यामुळे आज संजय राऊत यांच्याविरोधात लोकं आंदोलन करत आहेत.

त्यामुळे जे आज जोडे मारो आंदोलन करत आहेत त्यांनाच काही दिवसांनी लोकं जोडे मारतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

गद्दारीबाबत बोलतानाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, यांनी गद्दारी केली होती. मात्र ज्या शिवाजी महाराज यांना आम्ही आदर्श मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी गद्दारी आवडत नव्हती.

त्यांनी गद्दारांचे हात पाय तोडले, छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांना थरा दिला नाही म्हणून यांना पण थारा दिला नाही पाहिजे असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

यावेळी त्यांनी आमदार संजय शिरसाठ यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट हे वाचाळ वीर आमदार आहेत.यावेळी त्यांनी शिरसाठ यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, संजय शिरसाट यांना माझ्या जिल्ह्यातील जनता ज्या कमेंट करतात, त्यामुळे संजय शिरसाठ यांचे अधपतन होत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...