AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार संग्राम जगताप यांना अनिल देशमुखांच्या जागी मंत्री करा, नगरमध्ये ठराव

अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिकामं झालं आहे. त्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लावण्यात यावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

आमदार संग्राम जगताप यांना अनिल देशमुखांच्या जागी मंत्री करा, नगरमध्ये ठराव
आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्याची मागणी
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 3:11 PM
Share

अहमदनगर : खंडणी वसूलीच्या आरोपावरुन अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिकामं झालं आहे. त्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लावण्यात यावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी तसा ठरावही मांडण्यात आलाय. या ठरावात आमदार संग्राम जगताप यांनी मंत्रिपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. (Give the ministry to MLA Sangram Jagtap, Demand of NCP in Ahmednagar)

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी एक ठराव मांडण्यात आला. त्यात संग्राम जगताप यांची मंत्रिपदी वर्णी लावावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जगताप म्हणाले कि, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना 4 विधानसभा सदस्यामागे 1 मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 विधानसभा सदस्य असूनही प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पद मिळाले. हा अहमदनगर जिल्ह्यावर झालेला राजकीय अन्याय आहे. त्यामुळे जगताप यांना मंत्री पद देण्याची मागणी होऊ लागली आहे.

संग्राम जगतापांना शहरातील 8 सिग्नल दत्तक घेतले

अहमदनगर जिल्हा वाहतूक शाखेनं गेल्या वर्षी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करुन दीड कोटीच्या आसपास महसूल गोळा केला होता. या निधीतून महापालिकेला सिग्नल जिर्णोद्धार निधी देण्याची मागणी जागरुक मंचाने केली होती. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील 8 सिग्नल दत्तक घेतले. तसं पत्र त्यांनी जागरुक मंचाला दिलं होतं. शहरात वर्षानुवर्षे बंद असलेले सिग्नल सुरु करण्याची मागणी जागरुक मंचाकडून करण्यात येत होती. त्यानंतर कायनेटिक चौक ते प्रेमदान चौक दरम्यान राज्या महामार्गावरील 8 सिग्नलची देखभाल आणि दुरुस्ती स्वखर्चातून करणार असल्याचं जगताप यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं.

इतर बातम्या :

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक, ‘या’ 5 मुद्द्यांवर खल!

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन

Give the ministry to MLA Sangram Jagtap, Demand of NCP in Ahmednagar

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.