संजय राऊत यांचा भाजपाबद्दल खळबळजनक दावा, थेट म्हटले, दोन..
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने विरोधकांवर जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर आता संजय राऊत यांनी उत्तर दिले. यासोबतच त्यांनी काही आरोपही केली.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने एकच खळबळ उडाली. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, विरोधकांपैकी कोणीही आरक्षणाच्या मुद्द्यावर माझ्सासोबत डिबेट करावी, मी तयार आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डिबेटसाठी तयार असल्याचे म्हटले. त्यांनी वेळ सांगावी, मी तिथे पोहोचते. ज्यावेळी हा विधेयक मांडला जात होता, त्यावेळी मी दिल्लीत होते, तिथे काय घडले हे आम्हाला माहिती आहे. आता शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस स्वत: वकील आहेत ना? मग त्यांनी एकदा नीट वाचावे.
पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, संसदेत असलेल्या लोकांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का? हे संसदेत बसलेल्या लोकांची अक्कल काढत आहेत. त्यामध्ये त्यांचेही खासदार आहेत. मुख्यमंत्री किती खोटं बोलणार आहेत. फडणवीसांनी त्यांची स्तर सांगावी, कोणती स्तर आहे. भाजपाची कोणती लेव्हल आहे ती सांगावी. कोणतेही विधेयक पाडण्यात आले नाही, ज्याचा संबंध महिला आरक्षणासंदर्भात आहे.
संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला त्यांना प्रधानमंत्रिपदावरून मोदींना जाण्याचे वेद लागले आहेत, त्या गटाला. त्या गटात देवेंद्र फडणवीस आहेत का हे मला माहिती नाही. मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता आपल्याकडे राहावी, याकरिता हे बिल आणण्यात आलं.
हा फक्त आमचा आरोप नसून हे सत्य आहे. तुम्हाला महिलांना आरक्षण देण्यास कोणीही रोखल नाही. नरेंद्र मोदी यांनी मनात आणले असते तर हे विधेयक ते मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदी यांची इच्छा असती तर त्यांनी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी स्वत: चर्चा केली असती आणि मन वळवली असती, त्यापूर्वी त्यांनी ते केले. पण या बिलाचे सुत्रधार अमित शाह होते, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
