AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामंत लोणीवाले यांनी आरोप केले अन् सुभाष देसाईंचे पुत्र मिंधे गटात, संजय राऊत यांचे नेमके आरोप काय?

Sanjay Raut News | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र शिंदे गटात शामिल झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली. ते कधी शिवसेनेत नव्हतेच असं म्हणताना राऊत यांनी शिंदे गटातील एका मंत्र्यावर निशाणा साधलाय.

सामंत लोणीवाले यांनी आरोप केले अन् सुभाष देसाईंचे पुत्र मिंधे गटात, संजय राऊत यांचे नेमके आरोप काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2023 | 11:15 AM
Share

नवी दिल्ली | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सुभाष देसाई यांचं पुढे काय होणार, यावरून आडाखे बांधले जात आहेत. मात्र संजय राऊत यांनी यावरून सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. सुभाष देसाई यांचे पुत्र कधीची शिवसेनेत नव्हते आणि ते एकनाथ शिंदेंकडे गेल्याने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं राऊत म्हणालेत. तर भूषण देसाई एकनाथ शिंदे गटात कसे गेले, हा प्रश्न सामंत लोणीवाले यांना विचारा, असं संजय राऊत म्हणालेत. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भूषण देसाई यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर आता भूषण देसाई शिंदे गटात शामिल झाले आहेत. त्यामुळे त्या आरोपांचं काय झालं हा प्रश्न सामंत लोणीवालेंना विचारा, अशा शब्दात संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

भूषण देसाई यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केल्यावरून संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेना नेते सुभाष देसाई हे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नेते नाहीत. काल सुभाष देसाईंनी त्यासंदर्भात सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले. त्यांच्या मुलाचा शिवसेनेशी संबंध नाही. पण मिंधे गट कधी बाप पळवतात, आता मुलंही पळवायला लागलेत. ही मेगा भरती सुरु आहेत, पण त्याला अर्थ नाही. ती कुचकामी आहे. मिंधे गटातले एक मंत्री आहेत, सामंत लोणीवाले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी याच देसाई यांच्या चिरंजीवावर काही आरोप केले होते. हेच ते. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असंही सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी कोकणातले सामंत लोणीवाले यांनी आरोप केले होते, त्याचं काय झालं, याचं आधी उत्तर द्या. मग आम्ही उत्तर देऊ… सुभाष देसाई हे ज्येष्ठ आणि आदर्श नेते आहेत. चिरंजीवांनी पक्षातून बाहेर पडणार असले तरी ते पक्षात कधी नव्हतेच. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही.

भविष्यात या ओझ्याचं करायचं काय?

अनेक नेत्यांवर आरोप करायचे आणि त्यानंतर त्यांना भाजपा किंवा शिंदे गटात घ्यायचं, असे प्रयोग सुरु आहेत. पण या ओझ्याचं भविष्यात भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना खूप ओझं होणार आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. संजय राऊत म्हणाले, ‘ भविष्यात या ओझ्याचं काय करायचं, हा सगळा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. वॉशिंग मशीन बिघडेल, इतका कचरा ते आत टाकतायत..

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....