AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांचं सरन्यायाधीशांना पत्र, केलं अभिनंदन, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी समोर येत आहे. तेलंगणामधील दहा आमदांच्या पक्षांतर प्रकरणासंदर्भात संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे.

संजय राऊतांचं सरन्यायाधीशांना पत्र, केलं अभिनंदन, नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 8:09 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे. तेलंगणामधील दहा आमदाराच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठाकडून परखड मत व्यक्त करण्यात आलं,  आपले निरीक्षण अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचा किरण दाखवणारं आहे, मूळ राजकीय पक्षाशी बेइमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल, त्याबद्दल आपले अभिनंदन असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

तेलंगणातील 10 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठाने परखड मत व्यक्त केलं, मुळ राजकीय पक्षाशी बेइमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल, विधानसभेचे अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती असल्यानं ते बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया लांबवतात हे आपले निरीक्षण अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचे किरण दाखवणारे आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. सरन्यायाधीश साहेब मी आजचा सामनातील प्रसिद्ध झालेला याच विषयावरील अग्रलेख पाठवत आहे. अग्रलेखातील भावना या महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या लोकभावना आहेत, असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शिवसेनेत दोन गट निर्माण झाले, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेने शिंदे गट. मात्र ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यांना अपात्र करण्यात आलं नाही, तसेच जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, त्या आमदार देखील पात्र ठरवण्यात आले. एवढंच नाही तर आमदारांच्या संख्या बळावर पक्षाचं चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं.

आता अशाच एका तेलंगणामधील प्रकरणात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे, त्यानंतर संजय राऊत यांनी सरन्यायाधीश यांचं अभिनंदन केलं आहे. अग्रलेखातील भावना या महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या लोकभावना आहेत, असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.