AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल!

आषाढी यात्रेला सर्वच संतांच्या पादुका श्री. विठ्ठल भेटीला येत असतात. (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur) 

पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल!
| Updated on: Dec 11, 2020 | 10:31 AM
Share

पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळयासाठी आज पंढरपुरातून साक्षात श्री. विठ्ठलाने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री विठ्ठला समवेत भक्त पुंडलिक आणि संत नामदेव यांच्याही पादुकांचे प्रस्थान आळंदीकडे झाले. आषाढी यात्रेला सर्वच संतांच्या पादुका श्री. विठ्ठल भेटीला येत असतात. (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur)

मात्र कार्तिक वैद्य एकादशी आणि त्यानंतर होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी साक्षात श्री विठूराया उपस्थित होते, असा संत नामदेवराय यांच्या अभंगात उल्लेख आहे. त्यामुळे प्रतिवर्षी श्री विठ्ठलाच्या पादुका संजीवन समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान करत असतात.

एसटी महामंडळाच्या फुलांनी आकर्षकपणे सजवलेल्या बसमधून 20 वारकऱ्यांसह श्री. विठ्ठलाच्या पादुकांचे आज सकाळी 9 वाजता प्रस्थान झाले. सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पादुकाची मंदिर समितीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली. त्यानंतर विठू नामाच्या जयघोषात पादुकांनी बसमधून प्रस्थान केले.

या बरोबरच संत नामदेव आणि भक्त पुंडलिक यांच्याही पादुका आज एसटी बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. यावर्षी कोरोना संकटामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रतिकात्मक पध्दतीने सोहळे साजरे केले जात आहेत. त्यामुळे शासन नियमानुसार आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या 20 वारकऱ्यांसह विठ्ठलाच्या पादुका फुलांनी सजवलेल्या बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या आहेत.  (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur)

संजीवन समाधीला आळंदीत सुरुवात

आळंदीत 724 व्या संजीवन समाधीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येत्या 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माथा टेकवायला येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि मंदिर प्रशासनाने संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur)

संबंधित बातम्या : 

सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी; 12 ते 14 डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद

724 व्या संजीवन समाधीला आळंदीत सुरुवात, 9 दिवस संचारबंदी लागू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.